• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home क्रीडा

बौद्ध व मराठा समाजातील आंतरजातीय विवाह ….वाचा सविस्तर

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 2, 2021
in क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
बौद्ध व मराठा समाजातील आंतरजातीय विवाह ….वाचा सविस्तर

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असं का म्हणलं जातं याचं हे एक ठळक उदाहरण म्हणजे बौद्ध व मराठा समाजातील आंतरजातीय विवाह होय.

ही गोष्ट आहे पेण जिल्हा रायगड येथील हर्षाली आणि जितेश ची.दोघेही सुशिक्षित उच्चशिक्षित, हर्षली नोकरी करते तर जितेश व्यावसायिक आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम,त्यांनी ते घरी कुटुंबीयांना कळवलं.घरून विरोध होईल असं वाटलं परंतु दोन्ही घरातून मुलांच्या पसंतीला संमती मिळाली.आणि दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

लग्नाच्या बोलणीसाठी दोन्ही कुटुंब एकत्र आली आणि लग्नाचा ठराव यशस्वी झाला,दोन्हीकडच्या पाच पाच व्यक्तीनी यात सहभाग घेतला.तुमची पद्धत आमची पद्धत आणि त्यातून काढलेला मध्यममार्ग यामुळे ही दोन्ही कुटुंबे एका आदर्श विचारांनी आणि मनांनी एकत्र आली.

दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईक आप्तेष्ठ मित्र मंडळी गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा आनंददायी सोहळा पार पाडला. हा सोहळा उर्वरित समाजासाठी एक चांगला आदर्श असून यामुळे अशा विवाहास समाजात असणाऱ्या जातीयभेदास समूळ नष्ट करण्याचे एक साधन म्हणून पाहता येवू शकते.

उच्च शिक्षित तरुणांनी यासाठी असा पुढाकार घेणे गरजेचे आहे,आपले शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहून तरुणांनी असे आदर्श उदाहरण दाखवून समाजाला योग्य वाटेवर आणणे ही जबाबदारी तरुणांची आहेच तसेच दोन्ही कुटुंब आणि उर्वरित समाजाची सुद्धा आहे.एक पाऊल समतेच्या दिशेने टाकणे जबाबदारी सर्वांची आहे.

अशा बातम्याना खरेतर मेनस्ट्रिम माध्यमात प्रसिद्धी मिळणे गरजेचे असते. निकोप आदर्श समाज घडविण्यासाठी अशा घटना एक आदर्श म्हणून समोर असतात,मात्र प्रस्थापित माध्यमे अशा गोष्टींकडे कायम कानाडोळा करताना दिसतात.आणि म्हणून जागल्या भारतची निर्मिती आणि आवश्यकता इथे नितांत भासते.प्रस्थापित माध्यमांना असा पर्याय उपलब्ध असणे समाजासाठी गरजेचे आहे.या आदर्श विवाहास जनविद्रोही न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा

जय भीम जय शिवराय!

Tags: आंतरजातीय विवाहपुणेबौद्ध व मराठा विवाहमुबंईसोलापूर

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
पंचगव्य राष्ट्रीय पुरस्कार ने विवेकानंद जितकर यांचा सन्मान मान अभिमान  विकास फौंडेशन चा उपक्रम आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित

देवमाणूस भेटला नि जीव जाता जाता उभा राहिला/दिघंचीच्या जितकरसरांच्या औषधांची किमया/

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .