बौद्ध धर्मियांच्या विहारात ब्राम्हणांचे काम काय? ब्राह्मण लोकांना बुद्ध एवढा हवाहवासा का वाटतो? मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम हैं…हे गाणं एकल होत….घर आमचे आंगण आमचे मग तुमची लुडबुड का हा प्रश्न संशोधनाचा आहे.बिहारमधील महाबोधी हे विहार बुद्धांचे आहे या विहारास आंतरतराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा सुद्धा आहे आणि 1949 च्या जाचक कायद्यान्वये विहाराचे ट्रस्टी म्हणून चार बौद्ध आणि चार ब्राह्मण यांची नियुक्ती केली जाते. त्या कायद्यामध्ये आस्थापनामध्ये बदल करून 2013 मध्ये एक कायदा पारित करण्यात आला आणि बिगर हिंदू असणाऱ्याही व्यक्तीला त्यामध्ये विश्वस्त म्हणून घेण्याचा कायदा पारित झाला
भारतातील प्राचीन परंपरा,बौद्धकालीन,नागवंशी परंपरा व सम्राट अशोकांनी बांधलेले 84 हजार बौद्ध विहार कुठे लुप्त झाली आणि या लुप्त होण्यामागे कोणते कारण आहे याचा सरळ अर्थ आहे भाकड पुराण कथा ब्राम्हणी ग्रंथातून प्रकट झालेले अवतार म्हणजे सांस्कृतिक दशहतवाद होय
थेरोपती चा तिरुपती झाला केशवपन करून भोळ्या भक्तांच्या केसाचा सुद्धा विदेशी मार्केट मध्ये बाजार केला.पंढरपूर येथील सावळा विठू हा सुद्धा बुद्ध आहे असे अनेक पुरावे भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या पुस्तकात दिले आहेत.सिद्धिविनायक मंदिर,शिर्डीचे साईबाबा,स्वामी समर्थ असे कितीतरी मंदिर आहेत या मंदिराचे व्यवस्थापन हे हिंदू धर्मीय विशेषता ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत.ख्रिश्चनांची मंदिरा ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे मुस्लिमांची मंदिरे मुस्लिमांच्या ताब्यात आहे मग बौद्ध धर्मियांचेच मंदिर मध्ये ब्राह्मणांची घुसकोरी का?
ज्या ठिकाणी दान,पैसा,सोन जास्त येतं त्या त्या ठिकाणी इथली ब्राम्हणी संस्कृती इथली ब्राह्मनी व्यवस्था प्रस्थापित व्यवस्था हे एन केन प्रकारे मलिदा लाटण्यासाठी आसुरलेले असते केसातून पैसा निर्माण करतो येतो यासाठी यांना चांगल्या बिझनेस मोडेलसाठी बिझनेस अवार्ड सुद्धा द्यावा लागेल.जन्म,मृत्य,होम,वास्तुदोष,पितृदोष , मातृदोष असे अनेक दोष काढून हे गल्लेलट्ट व पोटेभट्ट झालेत.महाबोधि विहाराला अरबो खरबो रुपयांच्या देणगी येतात .कोट्यावधी रुपये डोनेशन विदेशातून येतं विदेशातल्या बौद्ध बांधवांना माहित नाही किंवा बौद्ध विहारांमध्ये या बोधगयातील विहारांमध्ये आस्थापना कोणाच्या ताब्यात आहे तिथले विश्वस्त कोण आहेत.
या विहारात शिरकाव करून तिथे आपल्या ब्राह्मणी धर्माच्या चालीरीती रुढीपरंपरा याचं मदमस्तपणे सगळं पालन पोषण आणि आचरण येथे चालू आहे .बुद्धाला देव करण्याचा यांचा डाव आहे . या विहारासाठी थायलंडच्या राजाने 289 किलो सोने दिले म्हणजे असे कितीतरी सोनं देणग्या आणि लाखो करोडो रुपयाचे देणगी मिळत असेल तर या ठिकाणी ते का शिरकाव करणार नाहीत.त्यांना शेती,कारखाना,बँक, कंपनी अथवा बांधावर जाण्याची गरज आहे का? म्हणून तर आमच्या देवा बाबूंनी मराठ्यांना घायला आणले आहे.हा इतिहास आहे करण देवाभौचे काहीच नाही व त्यांना उद्योग करण्याची गरज नाही.
विहार व मंदिर आहेत हे पैसे जातात कुठे या पैशाचा लागेबंध इथल्या राजकीय व्यवस्थेचे आहे प्रशासनाशी आहे आणि इथली मंदिर म्हणजे आणि इथली व्यवस्था म्हणजे ब्राह्मणांची विरासत आहे.ब्राह्मणी व्यवस्था करत आहे सगळ्या व्यवस्थेचं मूळ हे सांस्कृतिक दहशतवादात आहे हे आपण बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणतात जो कौम अपना इतिहास भूलाती है कौम अपना इतिहास नही बना सकती आम्हाला सुद्धा इतिहासाचा ज्ञान पाहिजे.
सांस्कृतिक दहशतवाद म्हणजे काय कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा शिवरायावर तलवार चालवतो पुस्तकात फक्त कृष्णाजी भास्कर हा उल्लेख केला जातो.शिवरायांना शूद्र म्हटलं जातं संभाजी महाराजांना रंगेल म्हटलं जातं .महाराजांची बदनामी केली जाते शाहू महाराजांची बदनामी केली जाते यावं एवढंच काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा प्रचंड प्रसारणा व्यवस्थेने केलेले आहे आणि आता अलीकडे बाबासाहेबांच्या नावाचा उदो उदो करण्याची प्रथा आणि हे सगळं चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्वाश्रमीचे महार बौद्ध आणि एससीतल्या सर्व जाती आज आपला आयकॉन मानतात आपला विचाराचा आदर्श मानतात.
भारतातील बहुसंख्य लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मार्गक्रमण करतात हे इथल्या व्यवस्थेला पोटात दुखत आहे.
देव देश धर्म हा काही पक्ष व नेत्याचा अजेंडा आहे.त्यांना माहित आहे देवाविषयी कोण बोललं तर धार्मिक मुद्दा होऊ शकतो देशाविषयी बोलल तरी धार्मिक मुद्दा होऊ शकतो आणि धर्माविषयी बोललं तरी धार्मिक मुद्दा होऊ शकतो हा मोठा विरोधाभास आहे आणि काही संस्कृती या देशांमध्ये त्या पद्धतीने वाटचाल करते अगदी इस्कॉन मंदिराचा जर आपण उदाहरण घेतलं तर जगामध्ये अनेक देशांमध्ये इस्कॉन मंदिर आहे त्या ब्राह्मणी संस्कृतीने भारतासह सुद्धा जगातील अनेक देशांमध्ये कब्जा करायला सुरुवात केलेली आहे
आजही आम्ही आंबेडकरी म्हणून गाव कुसात अडकून पडलेला आहे भावकीत, गावकित ,नात्यात गोत्यात अडकून पडलेली आहे .बांधामध्ये अडकून पडलेला आहे आणि आमचा शत्रू आणि मित्र या मधला आम्हाला फरक कळंना आम्ही आमचेच पाय ओडण्यामध्ये मस्त मशगुल आहोत आम्ही आमच्यावरच वार करतोय त्यामुळे आम्हाला ब्राह्मणवाद्यांना विरोध करण्याची गरज उरली आहे का ?ब्राह्मणवादी आमच्या शत्रू आहेत का आम्ही आमचे शत्रू आहोत हे आम्हाला कळायला काही मार्ग नाही बांधवानो येणारा काळ जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर हातात हात घालून आपल्यातले हेवे दावे मतभेद सगळे बाजूला ठेवून एका ठराविक अजेंडा वरती आपण एकत्र आलं पाहिजे
तर या देशातील या राज्यातील या समाजातील सर्व लोकांना आपण तथागत बुद्धांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिव फुले ,शाहू ,आण्णाभाऊ ,उमाजी नाईक, संत तुकाराम, पेरीयार रामास्वामी,संत गाडगेबाबा,संत बसवेश्वर महाराज यांच्या विचारांमध्ये आपण सर्वजण एका विचारानं चालू शकतो . येणाऱ्या काळामध्ये इथल्या व्यवस्थेला हरवण्यासाठी विचाराची एक वाक्यता पाहिजे महाबोधिविहार हे बौद्धांचा आहे आणि बौद्धांना मिळालंच पाहिजे इथे ब्राह्मण वाद्यांची ढवळाढवळ अजिबात खपवून घेतले जाणार नाही तसा कायदा पारित झाला पाहिजे आमचे जे बौद्ध आमदार आहेत खासदार आहेत आमचे प्रशासनातील अधिकारी आहेत अगदी आमच्या हायकोर्टचे भूषणजी साहेब आहे यांनीही आज बोधगया मधल्या आंदोलनाची दखल घ्यावी जगभरातून या आंदोलनाला समर्थन मिळते आहे
महाराष्ट्रातून पक्ष संघटना आणि देशातील अनेक पक्ष संघटना याच्यावरती काम करत आहेत रामदास आठवले प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे साहेब एडवोकेट डॉक्टर सुरेश माने अगदी म्हणजे दलित चळवळीतले सगळे चेहरे आणि या मुद्द्यावर एकत्र यावं आम्ही समाजबांधव म्हणून आपल्या सगळ्या ताकतीने एक लढू या एक निर्धार करूया आणि बोधगया येथील विहार ताब्यात घेऊया एवढाच संकल्प करूया
जय भीम
मो.7020400150
Email: londhekumar77@gmail.com
दि.02/03/2025
#mahabodhiviharmarathimahiti #bodhgaya #bihar #kumarlondhe