जगात जर्मनी व भारतात परभणी हे वाक्य ऐकून उर भरून येतो परंतु परभणी मधील दोन घटना या मन प्रचंड वेदनादायी मानवतेला काळीमा फासणाऱ्या घडल्या व त्यामुळे परभणी भारतात चर्चेत आले
एक म्हणजे संविधान प्रतिकृती झालेली मोडतोड व त्यामुळे उसळलेला आगडोंब शहरातील कडकडीत बंद ला लागलेले हिंसक वळण आणि दुसरी घटना म्हणजे सोमनाथ सुर्यवंशी या वडार समाजातील वकिली करणाऱ्या युवकाचा पोलीस मारहाणीत झालेला निर्दयी मृत्यू या घटनाक्रम होय.
याच अनुषंगाने आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी परभणीतील पोलीस दबाव तंत्राचा वापर करून पी आय घोरबांड यांना हाताशी धरून केलेले कोंबिंग ऑपरेशन हे परशुरामाने पृथ्वी जशी निक्षात्रिय केली तसेच या वर्दीतल्या परशुरामाने व त्यांच्या आका च्या आदेशाने लहान मुले,गरोदर बाया, बाळंतीण बाया यांना ही सोडलं नाही हो!
हात जोडून पदर पसरून विनवणी करत होत्या माय माऊली परंतु यांना दया आली नाही.अक्षरशः त्यांच्यावर एवढे अमानुष पने अत्याचार झाले यात खात्रीलायक माहिती म्हणजे 50 जण गंभीर जखमी व 150 च्या वर लोक जखमी झाले यांना न्याय कोण देणार ? पण यांना न्याय देण्यासाठी एक कर्तव्यदक्ष आमदार सुरेश धस पुढे आले.
त्यांनी अशी जादू केली परभणी ते मुंबई असा लाँग मार्च सुरु असताना ते बेचैन होते.त्यांना आंबेडकरी जनतेचे दुःख,पोलिसांचे दुःख व सोमनाथ सुर्यवंशी चे दुःख व महत्वाचे म्हणजे देवेन्द्रजी यांचे चेहऱ्यावर असणारे टेन्शन सहन न झाल्याने ते अस्वस्थ होते.लोकांचे दुःख दूर झाले पाहिजे यासाठी आमदार साहेब यांनी पुराणातील कथेप्रमाणे साक्षात वराह अवतार घेतला की काय ? असे प्रश्न लोकांना पडत आहे व माझ्यासारख्या व्यक्तीला स्वप्न पडत आहे.
आमदार धस साहेब यांनी गळ्यात निळा व डोक्यावर निळी टोपी घालून मुक्तपणे गोड व सुमधुर वाणीने सांगितले की,सोमनाथ सुर्यवंशी याचे मृत्युसाठी पोलिसांना जबाबदार धरू नये त्यांना आपण मोठ्या मनाने पोलिसांना माफ केले पाहिजे किती साधं सरळ व सुटसुटीत वाक्य आहे.सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वंजारा समाज,धनंजय मुंढे व बीड जिल्ह्यास वाल्या चा वाल्मीक करण्यात करण्यात धस साहेब यांचा वराह एवढा वाटा आहे हे सत्य कोणी ही नाकारू शकत नाही.
सोमनाथ सुर्यवंशी याची आई बिचाऱ्या धस साहेबांवर आरोप करतात की लेकरू जाण्याचं दुःख यांना काय कळणार? त्यांना दुःख कळतय पण दोन बायका असल्याने त्यांना दुःख होत नसावे बीड मधील ऊसतोड करणारा वंजारी जागा झाला तर वाल्मीक चा वाल्या होऊ नये यासाठी आमदार धस स्वतःचे दुःख लपवत आहेत
प्रत्येक विषय धसास लावल्याशिवाय धस काय गप्प बसत नाहीत ते वाल्या चा वाल्मीक करू शकतात व वाल्मीक चा वाल्या ही करू शकतात.प्रत्येक विषय धसास लावण्याच्या नादात आंबेडकरी समुदाय अंगावर येईल व माफी मागायला लावेल अस कधी ही धसांच्या मनाला वाटले नसेल या प्रकाराने त्यांच्या गोटया कपाळात गेल्या की काय अशी चर्चा सामान्य जनतेत सुरु आहे ज्या ज्या वेळी पृथ्वीवर दुःख वाढेल त्यावेळी धस सारखे महाशय वराहाचा अवतार घेतील त्यामुळे शिळ्या कढीला उत आणला तर बिघडले कुठे जय हो....!
संपादक जनविद्रोही-कुमार लोंढे