आजपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता, स्वत:वर विश्वास ठेवत, या परीक्षेला सामोरं जावे.
कोणताही ताण न घेता, आतापर्यंत केलेल्या अभ्यासाच्या आधारे बिनधास्त पेपर सोडवा.
🌀 सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना खालील गोष्टीची काळजी घ्यावी.
1. परीक्षेला जाताना हॉल तिकीट बरोबर ठेवावे.
2. हॉल तिकीट ची एक झेरॉक्स आपल्या बॅग मध्ये असावी.
3. कोणीही डिजिटल वॉच घालू नये.
4. कोणीही मोबाईल शाळेमध्ये घेऊन जाऊ नये.
5. ट्रान्सपरंट रायटिंग पॅड, ट्रान्सपरंट पाऊच, मोठी पट्टी, कंपास मधील सर्व साहित्य, पेन्सिल खोड रबर, दोन पेन पाण्याची बाटली, आवश्यकता असेल तर रुमाल बरोबर घेऊन जावे.
6. उत्तर पत्रिका हातात आल्यावर पूर्ण उत्तर पत्रिका चेक करणे, पेज नंबर चेक करणे नंतर त्यावर माहिती भरणे व उत्तर पत्रिकेच्या बॉर्डर्स आखणे.
7. पेपर सोडविताना खडाखोड न करता शांत चित्ताने प्रश्न वाचून प्रश्नांची उत्तरे सोडवावीत. न गडबडता करता शांतपणे पेपर सोडवावा.
8. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावा.
9. बारकोड स्टिकर आणि आपला नंबर चेक करून पहावा. 9. जर काही त्रास होत असल्यास त्या ठिकाणी असणाऱ्या सुपरवायझरला कल्पना द्यावी.
10. पेपरला जाताना कोणत्याही प्रकारचे अभ्यासाचे साहित्य जवळ नाही ना याची खात्री करून वर्गामध्ये एन्ट्री करावी.
सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांना जनविद्रोही न्यूज च्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा.
विजयी भव…

