आज 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी (ता.माळशिरस. जि.सोलापूर) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चांदापुरी गाव चे माजी सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष भजनदासजी चोरमले यांच्या हस्ते संविधान प्रतिमेचे पूजन ध्वजारोहण करण्यात आले.प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,सचिव डॉ.पंचशीला लोंढे उपस्थित होते.स्वागत गीत व लेझीम नृत्य चे अप्रतिम सादरीकरण विद्यार्थिनी यांनी केले.
चांदापुरी गावचे सरपंच जयवंत सुळ यांचे हस्ते संविधान प्रतिमेस हार घालून व झेंडा दाखवून रलीस सुरुवात करण्यात आली. संपूर्ण गावातून संविधान प्रतिमा हातात घेऊन जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी रॅली ने यशस्वी केली. भिजोय लोंढे,शोलक हगवने, चैतन्य वाघमारे ई विद्यार्थी यांनी जोरदार भाषण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भजनदास चोरमले म्हणाले जे विद्यार्थी बालवयात दहावी पर्यंत आई,वडील,शिक्षक यांचा आदर करतात ते विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतात.शिस्त संस्कार व नम्रता असेल तर यश नक्की मिळते डॉ.कुमार लोंढे व डॉ. पंचशीला ताई ही शिक्षण संस्था चालवत आहेत हे काम सोप नाही.शिक्षक यांनी सुद्धा पगारासाठी काम न करता संस्थेस झोकून देऊन काम केले तर यापेक्षा दुसरे समाधान नाही असे महत्वपूर्ण विवेचन त्यांनी केले
संस्थेचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे म्हणाले विद्यार्थी वर्गासाठी आम्ही आमचं आयुष खर्ची घालतो आहे त्यासाठी प्रचंड त्याग,बलिदान करण्याची आमची तयारी आहे तुम्ही दोन पाऊले पुढे आला तर मी दहा पाऊले पुढे येईन व तुम्हाला देशात नव्हे तर जगाच्या स्पर्धेत कोणत्याही विद्यापीठात प्रवेश व करियर साठी मी अविरत प्रयत्न करायला तयार आहे.आपल्या संस्थेत निवासी साठी पुणे,मुंबई सातारा व वेगवेगळ्या ठिकाणाहून शिक्षणाच्या गुणवत्तेमुळे मुले येत आहेत. NEET,JEE,NDA पोलीस भरती,स्पर्धा परीक्षा व नालंदा सायन्स गुरुकुल अकदामी,मंथन,नवोदय,शिष्यवृत्ती,सैनिकी अशा परीक्षेत मुले नाव मिळवत आहेत हे यश उच्चशिक्षित स्टाफ चे आहे .एम एस सी बी एड असणारे चार प्राध्यापक पुर्णवेळ आहेत डॉ. पंचशीला मॅडम व असा तेरा स्टाफ संस्थेत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रमुख प्रा विठ्ठल देवकाते म्हणाले मोबाईल हा घातक आहे मोबाईल पासून दूर राहा विद्यार्थ्यांनी शिक्षणात गुरगुर करावी शिस्त सोडून वागू नये आपण सर्व संस्कारी मुले असल्याने मी आपण सर्वास वह्या वाटत आहे व संस्थेत पहिला न येणाऱ्या विद्यार्थ्यास दहा हजार रु बक्षीस मी देणार असल्याचे नमूद केले
संस्थेचे प्राचार्य आर वायदंडे यांनी संस्था प्रमुखांना सांगितले की आम्ही पाहिजे तेवढा त्याग करून विद्यार्थी घडविण्यासाठी तयार आहे आपल्या बरोबरीने पाऊले टाकण्याचा निश्चय व आश्वासन आम्ही देत आहोत असे मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शाळा समिती जितेंद्र देठे, सेंट्रल ह्युमन राईट आय टी सेल तालुका प्रमुख गोविंद वाघमारे,शहाजी सरतापे,भारत सरक ,तानाजी शिंदे,राजू खरात ई मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डी कारंडे, प्रा.अल्ताफ पठाण, प्रा.टी रणवरे,अरुणा लोंढे मॅडम, गायकवाड ए एम सर, गायकवाड ए बी सर,गणेश पवार सर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्व मान्यवरांचे आभार प्रा.नितान सरक यांनी मानले