• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

जय भीम’ चित्रपटामागील खरी कथा; जाणून घ्या ‘त्या’ घटनेची माहिती

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
November 7, 2021
in देश-विदेश, मनोरंजन, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
जय भीम’ चित्रपटामागील खरी कथा; जाणून घ्या ‘त्या’ घटनेची माहिती

गडचिरोली / प्रतिनिधी दि. 6/11/2021:-

अभिनेता सूर्या शिवकुमार आणि प्रकाश राज यांची स्टारकास्ट असलेला “जय भीम” हा चित्रपट २ नोव्हेंबरला ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे.
सध्या हा चित्रपट सोशल मीडियासह माध्यमांत चांगलाच चर्चेत आहे. IMDb ने याला 10 पैकी 9.7 इतके रेटींग्ज दिले आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून यात दाखवण्यात आलेला वकील तसेच इतर पात्रे हि सर्व सत्य घटनेवर आधारित आहेत. चला जाणून घेऊ काय होती ती घटना?


आदिवासींच्या अत्याचाराची कहाणी आहे. हि गोष्ट 1993 सालातली आहे. तमिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील एका गावात सत्ताधारी पार्टीच्या अर्थात जयललितांच्या एआयएडीएमके पक्षाच्या एका बिनीच्या कार्यकर्त्याच्या घरात चोरी होते.
राजकीय पुढार्‍याच्या घरात चोरी झाल्याने संशयाची सुई इरुला या आदिवासी जमातीमधील एका युवकावर याच्यावर येते. काबाडकष्ट करुन जगणाऱ्या या आदिवासींवर ब्रिटीश काळामध्ये गुन्हेगारीचा शिक्का होता. त्यामुळे या जमातीकडे स्वातंत्र्योत्तर काळातही गुन्हेगार म्हणून बघितले जात होते. 80 च्या दशकात हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात येवून काबाडकष्ट करुन आपले जीवन कंठत होते. राजा कन्नु नावाच्या युवकाने ‘त्या’ कार्यकर्त्याच्या घरात चोरी केल्याच्या केवळ संशयावरुन पोलीस त्याला अटक करतात.
पोलीस कस्टडीत टाकून थर्ड डिग्रीचा वापर करुन त्याला मारहाण केली जाते. त्याच्याबरोबर त्याच्या नातेवाईकांनाही अटक करुन असह्य यातना दिल्या जातात.


शेवटी पोलिसांच्या मारहाणीत राजा कन्नुचा मृत्यू होतो. पोलीस त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट शेजारील राज्यात म्हणजेच पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशात लावतात. इकडे काही महिन्यांची गरोदर असणारी राजा कन्नुची पत्नी आपल्या नवर्‍याला न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यासह न्यायालयाचे उंबरे झिजवते.
या वकिलाने मिळवून दिला होता न्याय. राजा कन्नुची पत्नी न्याय मिळावा यासाठी काही सामाजिक संघटनांच्या मदतीने के. चंद्रु या नवोदित वकिलाला भेटते.
मार्क्स-पेरियार-आंबेडकरांच्या विचाराने झपाटलेला हा नवोदित वकील कन्नुची केस मद्रास हायकोर्टात चालवतो. व्यवस्थेशी लढत असताना प्रचंड त्रास होतो.
परंतू गावकुसाबाहेर जगणारीही माणसेच असतात, त्यांनाही माणसासारखेच जगता आले पाहिजे, या विचाराने झपाटलेला के. चंद्रु बलाढ्य व्यवस्थेशी अखेरपर्यंत लढतो.
कन्नु ला न्याय मिळेपर्यंत 1994 साल उजाडते. याचा तपास तत्कालीन पोलीस महानिरीक्षकांच्या माध्यमातून केल्यानंतर मद्रास हायकोर्टाचे दोन न्यायमूर्ती कन्नु च्या कस्टडीतील खून प्रकरणी पोलीस निरीक्षकासह चौघांना कठोर शिक्षा सुनावतात. के. चंद्रु सारखे नवोदित विधीज्ञ राज्याच्या महाअधिवक्त्याशी लढून ही केस जिंकतो. ही सुमारे 28 वर्षापूर्वी सोपी गोष्ट नव्हती. परंतू के. चंद्रु यांनी हे शक्य करुन दाखवले.
के. चंद्रु यांनी पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्यू पावलेल्या राज कन्नु ला न्याय मिळवून दिलाच. त्याचबरोबर न्यायाधीश झाल्यापासून उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत सुमारे 90 हजारांपेक्षा जास्त संवेदनशील केसेस हाताळून खर्‍याअर्थाने अनेकांना न्याय दिलेला आहे. 2013 साली ते मद्रास उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. परंतू त्यांनी आपले सामाजिक काम सुरुच ठेवले आहे. जय भीम चित्रपटाच्या माध्यमातून ते खर्‍या अर्थाने पटलावर आले आहेत.
हैद्राबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.चंद्रु यांच्या पुस्तकावर आधारित असणारा “जय भीम” हा चित्रपट फक्त चित्रपटच नव्हे तर व्यवस्थेच्या नाकावर टिचून लाखो वंचित घटकांच्या कंठाला आवाज देणारे जळजळीत वास्तव आहे.
प्रत्येकाने हा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे व जातीयवाद, भाषावाद, या अमानवीय गोष्टींना तिलांजली दिली पाहिजे

Tags: Cinema jay bhimJai bhimJay bhimजय भीम

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना अटक;

धर्माची झापड डोळ्यावर बांधलेल्या बहुजणांनो लवकर जागे व्हा नाहीतर नाहीतर गुलामगिरी अटळ आहे 🎙️ ❓ रा. स्व. संघाचे भयानक षडयंत्र ❓राहुल वानखेडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .