• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Monday, June 23, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

देशात सध्या ‘खुर्ची’ साठी किळसवाणा प्रकार सुरु-गोरगरीब कष्टकरी जनतेकडे सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्षांचा होतोय दुर्लक्ष : भाई जयंत पाटील यांची टिका

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 11, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
देशात सध्या ‘खुर्ची’ साठी किळसवाणा प्रकार सुरु-गोरगरीब कष्टकरी जनतेकडे सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्षांचा होतोय दुर्लक्ष : भाई जयंत पाटील यांची टिका

गडचिरोली ( ११ जुलै ) : करोनाने संपूर्ण देश त्रस्त असून सुद्धा सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्ष हे कोणीही गोरगरीब आणि कष्टकऱ्यांकडे लक्ष देत नाही, खोटे दावे करत खुर्चीच्या माध्यमातून एक किळसवाणा प्रकार आज देशात सुरु आहे. अशी टिका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.
गेले दोन महिने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, विद्यार्थी नेत्या साम्या कोरडे, पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर नलावडे पाटील व पक्षाचे खजिनदार भाई राहुल पोकळे या काही नेत्यांनी ऑनलाईन पद्धतीने पक्ष अभ्यास शिबीरे आयोजित केली. या शिबीरांमध्ये पक्षाचे जवळपास पंधरा हजार कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच भाई चंद्रशेखर नलावडे – पाटील यांच्या प्रयत्नांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी सहभागी कार्यकर्ते व विजेत्यांचे कौतुक करतांना भाई जयंत पाटील बोलत होते.
भाई जयंत पाटील म्हणाले,अशा परिस्थितीत सक्षम, जबाबदार आणि बदल घडवू शकण्याची क्षमता ठेवणारे कार्यकर्ते व नेतृत्व घडवणे अत्यंत आवश्यक असून ती जबाबदारी ही शेतकरी कामगार पक्षासारख्या पक्षांची आहे. कार्ल मार्क्सच्या ‘टीका आणि आत्मटीका’ या संकल्पनेवर आपल्याला वाटचाल करायची आहे.
सुरुवातीच्या काळात शेतकरी कामगार पक्षाचे जे अभ्यास वर्ग व्हायचे त्यात अनेक नेते तयार झाले व ते आजही पक्षाबरोबर ठामपणे राहून लाल बावटा घेऊन समाजात कार्यरत आहेत. परंतु आजच्या या सोशल मीडियाच्या आधुनिक युगात सर्व काही बदलून गेल्याचे आणि सर्व काही झटपट प्राप्त करण्यासाठी आजची तरुण पिढी आग्रही असल्याचे आपल्या ध्यानात येते, असे मत भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
एक नवीन पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून एकच योग्य मार्ग आहे आणि तो म्हणजे अभ्यास शिबीर व स्पर्धा, असे म्हणत सहभाग घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
आज गडचिरोलीसारख्या अतिटोकाच्या जिल्ह्यातही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत. शेतकरी,कष्टकरी,कामगार आणि आदिवासी, बहुजन समाजासाठी आपले अवघे आयुष्य झोकून देणारे कार्यकर्ते व गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे ध्येय ठेऊनच यापुढे शेतकरी कामगार पक्ष समाजामध्ये कार्यरत राहील,अशी आशाही सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

निबंध स्पर्धा विजेते
१) डॉ. दिपक सर्जेराव शेटके-पाटील वडकशिवाले, ता.- करवीर, कोल्हापूर
२) प्रा. डॉ. सुनिल पवार
पेण, जि.- राजगड
३) वैभव उत्तम जाधव, हिंगोली
४) शांताराम वाघ, पुणे
५) अविनाश निकुंभ, जळगाव
६) बापूराव भास्कर वराडे
७) आर्किटेक्ट सिद्धार्थ दिक्षीत
राजारामपुरी, कोल्हापुर
८) अर्चना मोहन वाघमारे,
घोडेगाव, आंबेगाव, पुणे
९) अंकुश मुढे
आटपाडी, सांगली
१०अ) अनिकेत कोळी, मोरा, कोलीवाडा, ता. उरण, रायगड
१०ब) डॉ. हर्षवर्धन भोसले रूकडी, ता.- हातकणंगले, कोल्हापूर

Tags: #गडचिरोली#शेतकरी कामगार पक्षपुणेमुंबईशेतकरी संघटनासोलापूर

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
भारतीय राज्य घटनेनुसार परीक्षा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगला पण फडणवीस यांनी कायदा घेतला हाती, न्यायालयात केस दाखल.

भारतीय राज्य घटनेनुसार परीक्षा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगला पण फडणवीस यांनी कायदा घेतला हाती, न्यायालयात केस दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .