नामांतर म्हटलं की वाद प्रतिवाद हा जणू ठरलेलाच आहे कारण मराठवाडा विद्यापीठ नामांतर, सोलापूर विद्यापीठ नामांतर तसेच आता महाविकास आघाडी सरकारनं नवी मुंबई येथिल आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाहीर केलेलं बाळासाहेब ठाकरेंच नाव आणि त्याला होणारा विरोध तर दुसरीकडे भुमिपुत्र दि.बांच्या नावाची होणारी मागणी, मिळणारं समर्थनही पाहावं लागेल. तत्पुर्वी बाळ ठाकरेंचं मिडीयानं आजपर्यंत उभं केलेलं चित्र अन् जाणीवपूर्वक पडद्याआड टाकलेली बाजू व दिबांच कार्य पाहणे गरजेचे आहे तेव्हाच आपण स्वत:च ठरवावं की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळ ठाकरे की दिबा.
दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, विरोधी पक्षनेते तसेच रायगडचे दोन वेळा खासदार होते. १९९६ साली महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार मिळाला होता. सिडको ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला व कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते. असे म्हणतात की, ‘दिबा’ उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरत असे. आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. त्यावेळी सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दिबांनी लढला तेव्हा पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांची ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. ते महात्मा फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक होते. त्यांनी ‘आगरी दर्पण’ मासिकाचे नियमित प्रकाशन सुरु केले. ते देव मानत नसत. त्यांचा कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, आगरी समाजातल्या मोठमोठे साखरपुडे, दारू पिऊन हळदी यांसारख्या काही चालीरीतींना विरोध होता.
भक्तांचा देव बाळ ठाकरे यांचे नाव नवी मुंबई येथिल विमानतळाला असावे का ? असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर नाही असेच येत. बाळ ठाकरे यांचं नाव विमानताळालाच काय कुठच देऊ नये कारण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून ज्यांनी उभ्या आयुष्यात केवळ स्वत:चे खिस्से गरम करण्यासाठी केला आणि त्याच्या मुलाने म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच शिवाजी महाराजांच नाव एका छोट्याचा वडापाव या खाद्यपदार्थाला देऊन शिवभक्तांच्या श्रध्देचं पाणी केलं. म्हणून तर डाॅ. बालाजी जाधव त्यांच्या नाठाळाचे काळी हानु माथा या पुस्तकात म्हणतात की, आमच्या इकडील दही – धपाटं या मेन्यूला शिवसैनिक बाळासाहेबांच्या प्रेमामुळे बाळ धपाटं नाव देणार आहेत म्हणे. तेव्हा डाॅ. बालाजी जाधव सरांना सागावं वाटतं की, तुम्ही तिकडे बाळ धपाटं बनवा आम्ही आमच्या इकडेही दाळ – भात हा मेन्यू खुप प्रसिद्ध आहे त्यांचं नाव बदलून ‘बाळ भात’ केलं तर चालेल का ? कारण आमच्याकडील शिवभक्त तशी चर्चा करत असतात. बाळ भात असं नाव ठेवल्यास ज्या भक्तांच्या भावना दुखावतील त्यांच्यासाठी आ. केशवराव धोंडगे एके ठिकाणी म्हणतात की, ज्यांच्या भावना दुखावल्या जातील त्यांनी आपल्या भावनेचा विमा उतरावा किंवा त्या भावनेचा गुच्छ बनवून तो एअरकंडीशन मध्ये ठेवावा. तसेच लेखक सुधिर ढवळे एका ठिकाणी म्हणतात की, माध्यमांनी (वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या) रंगवलेली व प्रस्थापित लेखक बुध्दीजुवी आणि सांसदीय राजकारण्यांनी जनतेच्या माथी मारलेली ठाकरे यांची प्रतिमा ही पुर्णपणे अनैतिहासिक, असत्य व पाखंडी आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी एक महापुरुषांची यादी जाहीर केली त्या यादीत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व बाळासाहेब ठाकरे या पिता पुत्राच्या नावाचा समावेश केला. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाला पसंती मिळत होती कारण त्यांचे विचार लेखण कार्य खुप चांगल्या प्रकारचं चळवळींना सतत उपयोगी पडणार आहे. पण बाळ ठाकरेंच्या नावाविरोधात समाजातून तीव्र सतंप्त प्रतिक्रिया येत होत्या तेव्हा मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले होते की, बाळ ठाकरेंनी आयुष्यभर दंगली घडवण्याचं काम केलं ते आमचे महापुरुष होऊ शकत नाहीत. असे म्हणून आपला विरोध दर्शवला होता. म्हणून तर भांडवलाचा सरंजामी देव बाळ ठाकरे या पुस्तकात सुधीर ढवळे म्हणतात की, बाळ ठाकरेंचा जो काही करिश्मा आजवर रंगवून रंगवून सांगितला गेलाय तो सुध्दा कधीच आपला रंग दाखवू शकलेला नाही, हा इतिहास ताजा व जिवंत आहे.
दिंबा महात्मा फुलेंच्या पुरोगामी विचारांचे पाईक होते तर बाळासाहेब ठाकरे पुरोगामी विचारांचे मारेकरी कारण घाशीराम कोतवाल व सखाराम बाईंडर यासारख्या पुरोगामी मराठी नाटकांवर हल्ले करणे….’उठाव लुंगी बजाव पुंगी’… जला दो जला दो लाल बावटा जला दो….ज्यांच्या घरी नाही पीठ, ते मागतात विद्यापीठ….मुस्लिम लांडे व दहशतवादी असे विधान करणारे बाळ ठाकरेच होते. (अधिक माहीतीसाठी वाचा सुधीर ढवळे लिखित भांडवलाचा सरंजामी देव बाळ ठाकरे ) म्हणूनच सांगावं वाटत की, ज्या बाळ ठाकरेंचा इतिहासच काळा कुट्ट जातीय द्वेषाचा आहे ते बाळ ठाकरे बहुजन समाजाचे महापुरुष होऊ शकतात का ? तरीही महाविकास आघाडी सरकारनं बहुजन समाजाच्या माथी मारण म्हणजे कावळ्याच्या हाती दिला दरबार अन् हगून केला बरबाद असं म्हणावं लागेल.
नवी मुंबई येथिल विमानतळाला दि. बा. पाटील यांचे द्यावे ही मागणी घेऊन लोक मागील पंधरा वर्षांपासून संघर्ष करत होते पण हे सत्तेवर असणारे महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न करता बाळ ठाकरे यांच्या नावाची घोषणा करते तेव्हा या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न सामान्य नागरिकही विचारेल तेव्हा नवल वाटू नये. ठाकरेंच्या नावाला समाजातून विरोध होतेय कारण बाळ ठाकरेंची प्रतीमा हे प्रसारमाध्यमांनी रंगवलेली होती तो रंग आता फिका होतोय हे स्पष्ट होतेय हे कोणीही नाकारू शकत नाही.
शिवस्मारक निर्माण करणे हा मुर्खपणा आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तेच ठाकरे परत म्हणायचे की, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व माझा मराठी माणूस शिवसेनेच्या पाठीमागे उभा आहे, तोपर्यंत शिवसेनेला व मलाही मरण नाही. पण बाळ ठाकरेच शिवरायांपासून दूर गेले. (संदर्भ- अॅड. पुरुषोत्तम खेडेकर लिखित बहुजन हिताय) तेव्हा बाळ ठाकरेंच नाव महापुरुषांच्या यादीत व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणा-या महाविकास आघाडी सरकारला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारावं वाटतं की, कोरोना काळात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं भुमिपुजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं तो महाविकास आघाडी सरकारचा व मुख्यमंत्री महोदयांचा मुर्खपणा ठरत नाही का ? याविषयी विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
‘रंगवला कोल्हा म्हणून
वाघ कधी होत नाही
दि.बा. पाटलाची सर
बाळासाहेबाला येत नाही.’
जे ठाकरे भारत पाकीस्तान हा क्रिकेटचा सामना होऊ नये म्हणून विरोध दर्शवत होते तेव्हा त्यांचे प्रशिक्षित सैनिक खेळपट्टी उकरण्याच काम करत असत पण हेच बाळ ठाकरे पाकीस्तानच्या जावेद मियादादला आमंत्रित करत असायचे पण हे बाळ ठाकरेंच दुहेरी वागणं त्यांच्या प्रशिक्षित सैनिकाच्या डोक्यात घुसू नये हेच या महाराष्ट्राच दुर्देव म्हणावं लागेल. याच ठाकरेंनी इंदिराजींनी २५ जून १९७५ ला लादलेल्या आणीबाणीचं समर्थन केलं होतं, युती सरकारच्या काळात मुंबई येथिल रमाईनगर मध्ये १० दलितांचे मुडदे पाडले गेले होते त्याचंही समर्थन, रिडल्स प्रकरण व मंडल आयोगालाही त्यांनी विरोध केला होता. (अधिक माहितीसाठी वाचा सुधीर ढवळे लिखित भांडवलाचा सरंजामी देव बाळ ठाकरे) मग आता तुम्हीच ठरवा की, नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला कर्मकांड व अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या म. फुलेंच्या विचाराने चालणा-या दिबांच नाव पाहीजे की ज्यांनी उभ्या आयुष्यात वारंवार द्वंव भुमिका घेऊन लोकांना संभ्रमात पाडून शिवरायांच्या नावाचा वापर केवळ स्वत:साठी केला त्या बाळ ठाकरेंच नाव पाहीजे ? दिबांच नाव योग्य वाटत असेल तर ठाकरेंच्या नावाला आपण आपला प्रामाणिक विरोध दर्शवला पाहीजे अन्यथा हे महाविकास आघाडीचं रामदासी समर्थक सरकार उद्या प्रत्येक ठिकाणी परशुराम – रामदास – टिळक – सावरकर आसाराम – रामरहीम यांचं नाव देईल तेव्हा वेळीच सावध व्हा.
सुधीर ढवळे म्हणतात की, शिवसेनेचा वाचन व प्रबोधनाच्या संस्कृतीशी कधी संबंध आला नाही. बाळ ठाकरे यांनी एकच संस्कृती शिकवली, राडा संस्कृती. टपोरी वर्गाला आकर्षित करणा-या ‘हटाव लुंगी बजाव पुंगी’ यासारख्या घोषणा देत सेनेने मुंबईतील मराठी घरांतील व मनातील असहायता संकलित केली आणि सुरू झाली राडा संस्कृती. आमच्या लोकांना ठाकरेंचा भगवा अवतार पाहुन वाटतं की ते आपलेच आहेत पण ते आपले होऊच शकत नाहीत. त्याविषयी अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे त्यांच्या बहुजन हिताय या पुस्तकात म्हणतात की, केवळ भगवा रंग आहे एवढ्यावर भुलू नका. तर तो भगवा रंग वारक-यांचा – बुद्धाचा – शिवरायांचा आहे काय याची खात्री करा. अन्यथा भगवा रंग पाहून ‘परशुराम – रामदास – टिळक – ठाकरे यांच्या पाठीमागे जाल तर तुमचा अंत अटळ आहे. म्हणून ‘शिवराज्याचा भगवा’ व ‘भाजप – शिवसेनेचा भगवा’ यातील फरक ओळखून झेंड्याच्या सोबत जावे. काॅग्रेस – राष्ट्रवादीच्या तिरंग्याकडे तर पाहुही नका. शेवटी जून १९७० च्या जनयुग मध्ये प्रकाशित झालेल्या बाबा नागार्जुन यांच्या ‘बर्बरता की ढाल ठाकरे’ (सुधीर ढवळे लिखित भांडवलाचा सरंजामी देव बाळ ठाकरे या पुस्तकाच्या शेवटी ही कवीता आहे.) या कवितेतील शब्दात सांगावं वाटतं की,
बर्बरता की ढाल ठाकरे !
प्रजातंत्र का काल ठाकरे !
शेवटी विद्रोही कवी विश्वांभर वराट यांच्या शब्दांत सांगावं वाटत की,
‘बाळ -भाटी, बाळ -रोटी
वाटल्यास म्हणा बाळ-वांगं
विमाणतळाला नाव मात्र
दि.बा. पाटलाशिवाय नग’
लेखक – संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
रेपे नवनाथ दत्तात्रय
repe9nat@gmail.com
प्रकाशित –
दैनिक मुलनिवासी नायक – दि. ०४.०७.२०२१