• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

बुद्धी भेदाचा खेळ रंगलाय.. देशात नेमके काय सुरू आहे❓ लाखो जिवंत घेणारी महामारी नेमके?? विजय पोहनकर यांनी व्यक्त केले विचार

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 2, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक
0
बुद्धी भेदाचा खेळ रंगलाय.. देशात नेमके काय सुरू आहे❓ लाखो जिवंत घेणारी महामारी नेमके?? विजय पोहनकर यांनी व्यक्त केले विचार

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 2 जुलै 2021

जागतिक समस्या असलेला कोविडं 19 हा विषय भारतात एक संधी म्हणून घेतला जात आहे. अनेकांनी ह्या महामारीत आपले हात ओले करून घेतले.लाखो जीव घेणारी महामारी नेमकी काय ? आजही नक्की काहीच सांगता येत नाही .कोणती लस किती दिवसांनी घ्यावी ह्यावर एक मत नाही .कारण पुरवठा वेळेवर होत नसल्याने लसचे अंतर वाढलेले आहे, मग प्रश्न उरतो ती प्रभावी असेल की नाही??!
या देशात नेमकं काय सुरू आहे? कोण काय करतंय ह्याचा थांगपत्ताही बहुजन वर्गाच्या लोकांना लागू नये. ह्याची उत्तम तजबीज करण्यात येत असते .मात्र,कोंबड झाकलं म्हणून सूर्य उगवणार नाही हे कदापिही शक्य नाहीच. सध्या देश प्रचंड आर्थिक संकटातून जाताना दिसतो ते फक्त आणि फक्त चुकीच्या धोरणामुळे. लाखो शेतकरी दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसलेत, तरी सरकार साधी चर्चा करत नाही, उलट मागच्या दाराने 3 काळे कायदे शेतकरी विरोधी ,भांडवलदार धार्जिणे असून लागू करण्याच्या प्रयत्नात आहेत . मात्र बुद्धी भेद सुरू.? महाराष्ट्र राज्यात जातीय समीकरण रंगविले.मराठा समाजाला आरक्षण, ओबीसी समाजाचे आरक्षण ह्यात दरी निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याची पापे सुरु आहेत .मात्र,राजकीय मंडळींना काही देणे घेणे नाही .बुद्धिभेदाचा प्रकार,?? जनतेला सर्व मूर्ख बनवीत आहेत. मग ते मराठा नेते असो वा ओबीसी नेते . लोकांचे लक्ष मुख्य समस्या वरून भटकवायचा हा गोरख धंदा सुरू आहे .सामान्य जनतेच्या गळ्याला दररोज फास आवळला जात असताना जातीपातीचे….लसीकरण जोरात का? कारण येथील बहुजन हा जातीला, धर्माला स्वतःच्या पोटा पेक्षा ज्यास्त महत्त्व देतो .
2020/ 2021 हे शैक्षणिक वर्ष मुलांच्या जीवनातून बाद झाले ते कदापिही भरून निघणार नाही .ह्यात सर्वात जास्त नुकसान हे ग्रामीण भारतातील बहुजन वर्गाच्या मुलांचे झाले आहे.आम्ही मात्र जातीय रंग खेळतोय.! शेती व शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे,आम्ही मात्र जातीय रंगात.?? शैक्षणिक सत्र बंद असले तरी न्यायालय फी वसुलीला विरोध करतांना दिसत नाही. तर राजकीय मंडळींचे असलेले शैक्षणिक फी वसुली अड्डे पालकांची लूट करतांना दिसतात. बँकिंग क्षेत्रात नवनवीन नियमावली लावून नवनवे कर जनतेवर लादण्याचा पराक्रम सरकार करीत आहे. एकीकडे बचतीवर, ठेवींवरील व्याज घटवायचे, भांडवलदारांना देशातून पैसे घेऊन पळवून जाऊ द्यायचे. ? कोण करतंय सगळं? या मागील दोन वर्षात पेट्रोलियम चे दर दुप्पट झाले,सामान्य जनता घरात पडून आहे.उत्पन्न शून्य असून महागाई चा भस्मासुर वाढता ठेवला.सामान्य जनतेला कंगाल करण्याचं धोरण केंद्र सरकार चाणक्य नीतीने आखत असतांना, आम्ही मात्र जातीय रंगात, बुद्धिभेदाचे बळी ठरतोय..! आज पेट्रोल 105 रु डीझल 95 रु गॅस 980 रु (गॅस सबसिडी शून्य) खाद्य तेल 200 रु लिटर. दूरदर्शन TV हे मनोरंजनाचे साधन महिना 150 रुपया वरून थेट 450 रुपयांवर गेला.तरी तेथे जनतेने काय बघावे हे मनुवादी ठरवतात .बहुजन महिला आजही मालिकांच्या गुलाम करून त्यांच्या बुद्धीवर राज्य सुरू आहे .सासू-सुनेचे भांडणे .नवऱ्याच्या 3 बायका.दारू घरात पिणे शिष्टचार, लव्ह-जिहाद हेच या इडियट बॉक्स कडून आपल्या घरात रीचविल्या जात,तेही पैसे घेऊन.सर्व देश एकहाती सुत्राकडे मार्गक्रमण करतोय.!विजबिला च्या नोटीस,वीजबिल भरा नाहीतर अंधारात रहा.या ज्वलंत जीवनावश्यक विषयवर बोलायला राजकीय मंडळींना वेळ नाही.सर्वपक्षीय नेते फक्त जातीय-धार्मिक राग खेळून जनतेला मूर्ख बनवीत आहे,हा बुद्धिभेदाचा खेळ मांडलेला असतांना या देशातील साहित्यिक गप्प का?370 कलम काढल्यावर जम्मू-काश्मीर शांत होईल.मात्र परिस्थिती काय आहे,सांगाल जनतेला.आजही बॉम्ब स्फोट होतात ना. बुद्धिभेद चालू द्या.लोकांच्या मेंदूवर ताबा मिळवला की वाटेल ते करता येत ह्याचे हेच परिणाम होतील.देश प्रचंड गतीने गाळात रुतत आहे.मात्र,राजकीय लोक समीकरणे बांधताना दिसतात.या देशाला करोना पासून मुकतात कधी मिळेल ह्यावर चिंतन होताना दिसत नाही.जनतेला तोंडाला मुचके बांधून किती काळ दाबनार आहात, ह्यावर उत्तर नाही.पूर्ण देशातील लहान-मोठे व्यापारी हतबल झाले.व्यापार मेटाकुटीला आला.शेतकरी वर्गाला पीकविमा देण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. मात्र,जात-धर्म सांगा आता लाखो लोक रस्त्यावर उतरविणारे रातोरात पैदातुम्हल होतील.मात्र,शेतकरी वर्गाला न्याय द्या म्हटलं की तो मी नव्हेच ह्या भूमिकेत सर्वच.
वाचक मित्रांनो! तुमचा आमचा बुद्धिभेद सुरू आहे.घरातील बजेट कोलमडले.उत्पन्न शून्य झाले.देशाचा gdp नीचांक गाठत आहे.मात्र,येथे रात्रीस खेळ चाले.मित्रांनो! पक्षीय व्यवस्था ही लोकशाहीत फक्त व्यवस्था आहे.सत्तेच्या मार्गाची.राजकीय पक्ष हे जातीय-धार्मिक सारखे करू नका.आपल्या समस्या कोणत्या,आपल्या मुलांचे भविष्य काय? या देशाला कोण कुठे घेऊन जात आहे.ह्यावर थोडा तरी विचार करा.गेली 2 वर्ष तुरुंगात पडल्यागत जनता असून शांत कसे बसता. किमान समाजमाध्यमांवर तरी बोला.व्यक्त व्हा! नाहीतर घरात घुटमळून मेलात तरी कुणाला काही देणेघेणे राहणार नाही.हा देश विकला जाईल. तेव्हा तुम्हला फक्त गुलाम होण्याशिवय काहीच उरणार नाही..(विजय विमल सहादेवराव पोहनकर जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ) 2जुलै2021)

Tags: #gadchiroli#laturMumbaiPune

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेल्या 15 लाख 96 हजार रुपयांच्या रोख रकमेसह स्फोटक साहित्य जप्त.

नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेल्या 15 लाख 96 हजार रुपयांच्या रोख रकमेसह स्फोटक साहित्य जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .