• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Sunday, June 22, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

इन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वांझेनंतर प्रदिप शर्मा, आता नंबर कोणाचे??

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 24, 2021
in महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
इन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वांझेनंतर प्रदिप शर्मा, आता नंबर कोणाचे??

मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 24 जून 2021:-

अंबानी यांच्या अँटीलीयान बंगल्या समोरील स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत सचिन वाजे, सुनील माने, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे यांच्यानंतर प्रदीप शर्मा या पाच संशयित आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे काम सुरू आहे, मात्र त्यांच्यानंतर अजूनही मुंबई पोलिसांच्या पैकी काही अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. यासंदर्भात पोलिस दलामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून, त्यांना सोडून दिले होते. मात्र प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता पुन्हा त्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संबंधातील माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडून समजली आहे.
प्रदीप शर्मा सेवेत आल्यानंतर, त्यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची सर्व जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या काळात मुंबईमधील अनेक मोठ-मोठ्या खंडणी प्रकरणावर कार्यवाही करण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या संपर्कात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी होते. प्रदीप शर्मा यांची सरकारने बदली केल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता.
परंतु राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही हे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी प्रदीप शर्मा यांच्या संपर्कात होते. प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता सबंधित पोलिस अधिकार्‍यांचा नंबर लागणार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसुख हिरण यांच्या हत्याकांड प्रकरणानंतर त्याचे मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर व प्रदीप शर्मा चालवत असलेले एक फाउंडेशन अडचणीत आले असल्याची चर्चा सुरू आहे. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांना ही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्याच बरोबर प्रदीप शर्मा चालवत असलेल्या फाऊंडेशनच्या काही कर्मचाऱ्यांना ही चौकशीसाठी समोर जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: MumbaiPuneSachin vaze

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
गेल्या तीन वर्षातील रुग्णालय निहाय मृत्यूंचा अहवाल सादर करावा – पालकमंत्री उदय सामंत

गेल्या तीन वर्षातील रुग्णालय निहाय मृत्यूंचा अहवाल सादर करावा – पालकमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .