• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home सामाजिक

गेल्या तीन वर्षातील रुग्णालय निहाय मृत्यूंचा अहवाल सादर करावा – पालकमंत्री उदय सामंत

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 24, 2021
in सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
गेल्या तीन वर्षातील रुग्णालय निहाय मृत्यूंचा अहवाल सादर करावा – पालकमंत्री उदय सामंत

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि 24 जून 2021:-

कोविडच्या महामारीचा लाभ घेऊन काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग याठिकाणी लक्ष केंद्रीत करावे. गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
कणकवली तहसिल कार्यालयात पालकमंत्री श्री. सामंत यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने उपस्थित होते.
आठवडानिहाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट, लसीकरण, मृत्यूदर, बरे होऊन घरी गेलेले रुग्णसंख्या याबाबतची माहिती घेऊन पालकमंत्री म्हणाले, चाचण्यांचे प्रमाण अजूनही वाढवा. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्या. अशा, अंगणवाडीसेविका, त्याचबरोबर परिचारिका यांना आवश्यक असणारी साधनसामुग्री वेळच्यावेळी द्यावी. गेल्या तीनवर्षात विविध कारणांनी जिल्ह्याचा मृत्यूदर कसा होता, याबाबतचा एक अहवाल सादर करावा. यामध्ये खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या आणि त्यांना असणारे आजार, याबाबतचा समावेश असावा.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विशेषतः दोडामार्ग आणि वैभववाडीमध्ये काही बोगस डॉक्टर्स वैद्यकीय उपचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचना करून खासदार श्री. राऊत म्हणाले, आयुष रुग्णालयात दोन वर्ग खोल्या करण्याबाबत आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्यावा. रुग्णांच्या नातेवाईकांवर खासगी रुग्णालयाकडून बिलांची जादा आकारणी होऊ नये याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या लेखाधिकाऱ्यांकडून बिले कमी केल्याबाबतची माहिती घ्या.
यावेळी संदेश पारकर, डॉ. संदेश कांबळे, तहसिलदार रमेश पोवार, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते.

Tags: पालकमंत्रीपुणेमुंबई

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
Next Post
अकरावी प्रवेश परीक्षा (CET) अशी असेल!शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण व शासन निर्णय

१२ वीच्या मूल्यांकनाचा फॉर्म्युला ठरला;? नियुक्त समितीची सर्वोच्च न्यायालयात माहिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .