अकलुज बागवान गल्ली येथील मज्जीदचे अतिक्रमण हटवण्याची मागणी !
दि.12/6/2021
अकलूज बागवान गल्ली या ठिकाणी डबल-मजली इमारत जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे.त्या शाळेच्या शेजारी मुस्लीम धर्मीय जामा मज्जीद आहे.धर्माच्या नावाखाली मज्जीदच्या कमिटीने शाळा बंद पाडून पूर्ण डबल मजली जिल्हा परिषद शाळेला भले मोठे जाळीचे कंपाउंड मारून शाळा मज्जीदच्या आवारात घेतली आहे.
महाराष्ट्रातील बहुजन वर्गाने शिकावं म्हणून महात्मा फुले-सावित्रीबाईंनी महाराष्ट्र राज्यात दगड-धोंडे खाल्ले.पण शाळा बंद पडू दिल्या नाहीत.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माला महत्त्व न देता शिक्षणाला महत्त्व देऊन भारताची लोकशाही राज्य घटना लिहिली ” शिका,संघटित व्हा,संघर्ष करा ” असा संदेश दिला शिव,फुले,शाहू,आंबेडकरांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम केलेल्या महाराष्ट्रात जर पुन्हा शिक्षण थांबवुन शाळा बंद पाडून त्या ठिकाणी धर्माचा बाजार मांडला जात असेल तर हे आम्ही सहन करणार नाही जि.प शाळेवर केलेल्या अतिक्रमणाची अकलूज ग्रामपंचायतीला पूर्व कल्पना असून ही कार्यवाही केली जात नाही.याचा अर्थ या राजकीय लोकांना मतासाठी पुरोगामी महाराष्ट्र संपवायचा आहे काय ? असा प्रश्न निर्माण होतोय ! तरी अतिक्रमण करणाऱ्या मस्जिदच्या समितीवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व शासकीय जागेवर अतिक्रमण होतय हे माहीत असून सुद्धा गप्प बसणाऱ्या संबंधित सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.अशी मागणी युवासेना अकलुज शहराच्या वतीने शहरप्रमुख शेखरभैय्या खिलारे यांनी उपविभागीय दंडाधिकारी अकलुज यांच्याकडे दि 5/4/2021 रोजी केली होती. परंतु अद्याप त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने आम्ही दि मंगळवार 16/6/2021 रोजी सकाळी 11-00 वा.अकलुज ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चा काढून अतिक्रमण काढण्यासाठी भाग पाडु ,सदर चे अतिक्रमण लॉकडाउनचा गैरफायदा घेऊन करण्यात आले आहे त्या शाळेसोबत ग्रामपंचायतची मुतारी सुद्धा अतिक्रमणात गेली आहे.सदरचे अतिक्रम तात्काळ न हाटवल्यास युवासेना पदाधिकारी स्वतः ते अतिक्रमण हटवतील.शिव,फुले-सावित्रीबाई,शाहू,
आंबेडकर यांच्या विचारांना तडा जाऊ देणार नाही.अशी आक्रमक भूमिका शेखरभैय्या खिलारे यांनी जामा मस्जिदच्या अतिक्रमण बाबत घेतली आहे.
आपला
शेखर राजाभाऊ खिलारे
युवासेना शहरप्रमुख अकलुज