मुलगा मुस्लिम व मुलगी ब्राह्मण बौद्ध धर्म स्वीकारून विवाह केल्याबद्दल समाजात व विशेषतः महाराष्ट्र मध्ये या विवाहाची चर्चा आहे.
आकांक्षा ठाकूर या ब्राह्मण समाजातील मुलीने व जनेजा ओसमानभाई या मुस्लिम समाजातील मुलाने दि ८/६/२१ रोजी बौद्ध पद्धतीने विवाह करून समाजामध्ये वेगळा आदर्श घालून दिला.
आज समाजामध्ये अनेक चाली-रीती ,रूढी, परंपरा, कर्मकांड याचे स्तोम माजले असताना या दाम्पत्याने विज्ञानवादी धम्माविषयी आस्था दाखवून अनोख्या पद्धतीने विवाह केला याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून व विशेष म्हणजे बौद्ध बांधवाकडून अभिनंदन होताना दिसत आहे.
रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार यामाध्यमातून जातीच्या उतरंडीत नेस्तनाबूत होणार आहेत हे मात्र खरे आहे येणाऱ्या काळात बहुजन बांधव व धर्मांतरित होणारे अनेक यांना विज्ञानवादी धम्माची गरज भासणार आहे.असे विवाह अभिनंदनास पात्र आहेत अनेक वर्षाच्या जातीच्या उतरंडीला या विवाहामुळे ब्रेक लागणार आहे.
Copyright2021