• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Tuesday, June 24, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

…तर अनेक जीव वाचवता आले असते; मोदी सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 9, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
…तर अनेक जीव वाचवता आले असते; मोदी सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले.

मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम 9 जून, 2021

केंद्र सरकार कोरोना विरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात अपयशी ठरले असल्याचे मत व्यक्त करित मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. सर्जिकल स्ट्राइक कऱण्याची गरज असताना तुम्ही सीमारेषेवर जवानांना एकत्र आणत आहात, पण तुम्हाला शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करता आला नाही. तुमची सर्जिकल स्ट्राइक करण्याची भूमिका असली पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते, असेही यावेळी न्यायालयाने सांगितलं.
केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेला घरोघरी जाऊन ७५ वर्षांपुढील तसंच अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचं लसीकरण करण्याची सूचना देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही सुनावणी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर पार पडली.
यावेळी न्यायालयाने महानगरपालिकेच्या वकिलांना विचारणा केली की, केंद्र सरकारने परवानगी दिली तर आम्ही दारोदारी जाऊन लसीकरण करण्यास तयार असल्याचे तुम्ही सांगितले होते. एका ज्येष्ठ नेत्याला घरात लस मिळाली असून ते देखील मुंबईत झाले आहे, त्यासंबधी आम्हाला विचारायचे आहे. हे कोणी केले? राज्य की केंद्र सरकार? कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. तसे केरळ आणि इतर राज्ये करत आहेत. देशासाठी मुंबई महानगरपालिका मॉडेल ठरत असताना तुम्ही घरोघरी जाऊन लसीकरण करु शकता. केरळने केंद्राच्या परवानगीची वाट पाहिली होती का?.
न्यायालयाने केंद्राला यावेळी घऱाजवळ लसीकरण करण्याच्या धोरणासंदर्भात विचारणा केली. कोरोना हा मोठा शत्रू आहे आणि आपल्याला त्याला हरवायचे आहे, हे तुम्हीदेखील मान्य कराल. शत्रू काही ठराविक लोकांच्या शरीरात असून तो बाहेर येऊ शकत नाही. त्याविरोधात तुमची भूमिका सर्जिकल स्ट्राइकची असली पाहिजे.
तुम्ही सर्जिकल स्ट्राइकची गरज असताना सीमारेषेवर सगळे बळ एकत्र करत आणत आहात, पण शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करत नाही. तुम्ही वाट पाहत आहात. लोकांच्या भल्यासाठी तुम्ही निर्णय घेत आहात, पण त्यासाठी फार उशीर झाल्याचे दिसत आहे. जर निर्णय लवकर घेतले असते तर अनेक जीव वाचले असते, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले. यावेळी केरळ सरकारने अंथरुणाला खिळलेल्यांसाठी घरी जाऊन लसीकरणाचा निर्णय घेतला असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. न्यायालयाने यावर केरळ आणि इतर राज्ये ही समस्या कशा पद्दतीने हाताळत आहेत? जर यामध्ये कोणत्याही अडचणी नसतील तर इतर राज्यांमध्ये करण्यात काय समस्या असल्याची विचारणा केली.
राज्यांनी पुढाकार घेतलेला असतानाच केंद्राने पण अद्यापही यावर विचार केलेला नाही. अशा कुटुंबियांच्या भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. अशा परिस्थितीशी तुम्ही कशापद्धतीने सामोरे जाता? अशा लोकांसाठी घरी जाऊन लसीकरण करणे हाच योग्य पर्याय आहे. मुंबई महानगरपालिकेने आपण तयार असून तुमच्या परवानगीची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांकडे केंद्राकडे परवानगी मागितली आहे का अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच प्रत्येक राज्यासाठी लागू होईल, असे राष्ट्रीय धोरण आहे का अशी विचारणा केंद्राला केली असून जर केरळ, बिहार, जम्मू आणि काश्मीर, ओडिशाने केले आहे, तर मग समस्या काय आहे? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. दरम्यान न्यायालयाने केंद्राला पुढील सुनावणीत उत्तर देण्यास सांगितले आहे. यावर पुढील सुनावणी ११ जूनला होणार आहे.

Tags: #pmoindia#मुंबई#सांगलीCmomaharashtraपुणे

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाव्यतिरिक्त इतरही बुरशीजन्य आहेत रोग…कोणते आहेत आजार?

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाव्यतिरिक्त इतरही बुरशीजन्य आहेत रोग...कोणते आहेत आजार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .