मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.आणि महत्वाचे म्हणजे ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी परीक्षा घेण्याचा विचार असल्याने नमूद केले.
यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
12
इयत्ता बारावी
Because of online sessions our studies are not prepared well so please remember that also
मी वर्ग १२ वी मधे शीकत असून एक माझ मत स्पष्ट करत आहे ,
आम्हा विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत
कारन कारेनाच्या वाढत्या प्रभावामुळे
Lockdown करन्यात आले होते / आहे ,
तर online अभ्यासक्रम करन्यात आला
आणी मग सर्वांना तो अनिवार्य झाला
पन त्यात ही काही अडचणी आल्या
( network problem , electricity , etc …)
१२ वी असल्याने तासीका पन जास्त आहेत ,
आणी खुप जन असे पन आहेत की ज्यांच्या कडे
Android mobile नाही
तर त्यांचे पन शैक्षणिक नुकसान झाले .
ह्यावर काही उपाय काढूनच
Paper घ्यावे …🙏