• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

काय तो रूबाब बाईंचा एवढा मोठा पुरस्कार घेताना पण डोक्यावरचा पदर काही खाली पडू दिला नाही ; राहीबाई यांना पदमश्री !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 30, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक
0
काय तो रूबाब बाईंचा एवढा मोठा पुरस्कार घेताना पण डोक्यावरचा पदर काही खाली पडू दिला नाही ; राहीबाई यांना पदमश्री !

काय तो रूबाब बाईंचा एवढा मोठा पुरस्कार घेताना पण डोक्यावरचा पदर काही खाली पडू दिला नाही ही आपली खरी संस्कृती हीच. आणि चार वर्ग जास्त शिकले की सांगतात आमची फॅशन आहे अशा लोकांच्या प्रवृत्तीला शाली मधून जोडे मारल्यासारखे ह्या माय माऊली नी केले आहे एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी या माऊलीने लुगडे घालून पुरस्कार स्वीकारला धन्यवाद माऊली त्यांचा परिचय खालील प्रमाणे#पद्मश्री_राहीबाई

राहीबाई या आदिवासी, निरक्षर. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा अकोला तालुक्यातील कोंभाळणे हे त्यांचे गाव. असा त्यांचा सुरुवातीचा परिचय. नंतरचा परिचय द्यायला सुरुवात केली की, त्यांना निरक्षर म्हणायला कोणीही धजावणार नाही असे कर्तृत्व !

काय केलंय या सामान्य बाईनं ?
अवाक व्हायला होतं त्यांच्याविषयी माहिती करून घेतल्यावर आणि विनम्रपणे हात जोडावेसे वाटतात त्यांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी !!!

राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.

सध्या आपल्याला ज्या भाज्या मिळतात त्यांच्या बियाण्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेले आहे. ती संकरित बियाणे असून त्यांचे yield जास्त असल्याने सर्व शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. दुर्दैवाने commercial सोडा, परंतु घरी वापरण्यासाठी सुद्धा शेतकरी हे पारंपारिक उत्पादन घेत नाही.


आज अशी परिस्थिती आहे की, या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु राहीबाईंनी ‘सीड बँक’ उभारली असून राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात ५० टक्के शेतकरी हे गावरान बियाणे वापरतात.
विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. देशभरातून ‘कृषी तंत्रज्ञान’ शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा हा प्रोजेक्ट बघायला येतात. संपूर्ण जगातील हा अशा प्रकारचा एकमेव प्रोजेक्ट आहे.

त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारचा गतवर्षीचा ‘ पद्मश्री ‘ पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

Copyright © 2021

Janvidrohi.com

Tags: PresidentRahi baiअकोलापदमश्रीपुणेपुरस्कारबातम्यामुंबईसोलापूर

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावास अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या ; थरारक घटना !

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावास अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या ; थरारक घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .