श्रीपूर |प्रतिनिधी,
छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान श्रीपूर-महाळुंग यांचे वतीने छ.संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम भारतमातेसाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करुन व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .
सदर कार्यक्रमास सोमा आदमिले,रोहन पाटील,ज्ञानेश्वर खुळे, बागल साहेब,जाधव साहेब,पाटील साहेब, काळुंबे सर,मोरे साहेब,विजय धुमाळ, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्यानी आपल्या भाषणातून छ.संभाजी महाराजांचे कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.सदानंद बनसोडे यांनी केले.
शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ऋषिकेश जाधव, आण्णा महाडिक,ज्ञानेश्वर डिंगणे,विनायक सुतार, विकास जाधव, पवन थिटे,रोहन थिटे,महेश मगर,सचिन मांगले, हामु धुमाळ,वैभव धुमाळ,आदेश धुमाळ,तानाजी जमदाडे,सागर कवडे,सोमा शिंदे,मयूर थिटे,सोमा चाव्हण,पवार साहेब,गोरख जाधव,नाना घोंगाणे,अक्षय कदम, राजू भोसले,अतुल माने,माऊली जाधव यांनी सदर कार्यक्रमास मोलाचे योगदान दिले.
