• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 13, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे


( लेखक,संपादक जनविद्रोही)
मो.7020400150

विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना वित्त गेले वित्तविनाश रुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले

आज महात्मा फुलेंची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने वरील वाक्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत असणारे महात्मा फुले यांचे विचार किती उपयोगी आहेत हे समजून येते आजच्या युवा व विद्यार्थी वर्गाने आणि धर्मांध असणाऱ्या पक्ष संघटना यांनी सुद्धा शिक्षणाला महत्त्व दिले तरच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रगती करता येऊ शकते महात्मा फुलेंचे विचार हे एका जातीसाठी नव्हे तर सर्व जातीतील व्यक्तीसाठी आहेत सर्व धर्मातील व्यक्तीसाठी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे विशेषतः या देशातील चातुरवर्ण व्यवस्था आहे यामध्ये ब्राह्मण ,वैश्य क्षत्रिय, शूद्र असे वर्गीकरण आहे परंतु अजून एक वर्ण आहे तो अतिशुद्र असणाऱ्या वर्गाचा होय.

या देशातील शासक वर्ग, स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणारे गुलाम कधी झाले यांना अजून पर्यंत समजले नाही व समजून घेण्याची मानसिकता नाही त्यामुळे भट व ब्राम्हण यांची सत्ता अबाधित राहते आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड केल्याशिवाय राहणार नाही.आपण पाहतो गुलामी मध्ये धन्यता शोधणारे वर्ग तयार होत आहेत.बलदंड असणारे हत्तीचे पिलू हत्ती झाल्यावर सुद्धा साखळदंडात धन्यता मानते या जोरावर माहूत त्याला ताब्यात ठेवतो अशीच काही अवस्था बहुजन समाजाची झाली आहे हत्ती हा बहुजन समाज आहे, साखळदंड ही ब्राह्मणी व्यवस्था आहे व हत्तीवर बसलेला माहूत हा ब्राह्मण आहे ज्या दिवशी हा हत्ती जागा होईल त्या दिवशी हत्तीच्या पायाखाली कोण असेल हे इतिहास वाचल्यावर व छावा सिनेमा पाहिल्यावर लक्षात येईल

प्रसिद्ध विचारवंत होमर असे म्हणतो “ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचे अर्धे सदगुण हिरावून घेतले जातात.”
याचा अर्थ असा आहे की भारतातील शूद्र व अतिशूद्र हजारो वर्षे ब्राम्हणाच्या गुलामीत आहेत त्यांची अवस्था काय असेल असा प्रश्न महात्मा फुले विचारतात.

आपण सद्य स्थितीत एक मोठे व ज्वलंत उदाहरण पाहू या बिहार येथील महाबोधी विहार हे बुधिस्ट लोकांच्या ताब्यात द्या 1949 कायदा रद्द करावा म्हणून देशभर व जगभर आंदोलन चालू आहे या विहाराचे ट्रस्टी हे ब्राम्हण कसे काय असू शकतात कारण या ब्राम्हणांचे प्रेम फक्त मलिद्यावर आहे जगभरातून दान व सोन या विहारसाठी येत आहे थायलंड सरकारने या विहारसाठी 250 किलो सोने दिले आहे या संपत्तीवर कब्जा करण्याचा यांचा धूर्त हेतू लक्षात येतो यांनी
लक्ष्मीआई,मरीआई,म्हसोबा,खंडोबा यांचे पोतराज व्हावे, वाघ्या व्हावे,मुरळी व्हावे पण ते तसे वागतील का याचा विचार आपण करावा व यांची कटू नीती आपण समजून घ्यावी.

ब्राम्हणाच्या गुलामगिरीचे समूळ उच्चाटन करणे हे महात्मा फुले यांचे जीवितकार्य होते त्यांनी ब्राम्हणी मुखवटा टराटरा फाडला एवढेच काय त्यांचा धर्माच्या आड दडलेला चेहरा लोकांच्यासमोर आणला आहे.परशुराम,वामन या देवास महात्मा फुले यांनी नागवे केले आहे
धर्म ,देव,ईश्वर,मंदिर यातून ब्राह्मण आपली व्यवस्था राबवत असतो.हे बहुजन समाजास पटवून सांगण्यात महात्मा फुले यशस्वी झाले आहेत परंतु ते समजून घेण्यात आम्ही कमी पडतोय ही बहुजन समाजाची शोकांतिका आहे मराठी मध्ये एक वाक्य आहे दोघांचे भांडण व तिसऱ्याचा लाभ अशी असणारी परिस्थीती आपणास बदलावी लागेल यावर उपाय म्हणून महात्मा फुले सांगतात प्रथम ब्राम्हणाच्या धर्माचा विध्वंस करावा लागेल त्याशिवाय गुलामी संपणार नाही.

ब्राह्मणी धर्मानुसार या देशांमध्ये एक ही क्षत्रिय नाही त्यामुळे आपण सर्वजण एक तर शूद्र आहोत अथवा अति शूद्र हा लेख वाचत असताना आपण कोणत्या वर्गात येतो याचे विवेचन करणे महत्वाचे आहे.

गुलामगिरी ग्रंथानुसार महात्मा फुले लिहितात परशुराम हा भट लोकांचा मुख्याधिकारी म्हणजे CEO आहे

त्याने क्षत्रिय लोकांचे प्राण घेतले अगदी चार चार पाच पाच महिन्याची गरीब बिचारी निर्दोष मुले हिसकावून त्यांचे प्राण ही मोठ्या दुष्ट रीतीने घेतले द एवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने ज्या क्षत्रिय पुरुषांच्या हत्या केल्या त्यांच्या पत्नी च्या पोटामध्ये जे बाळ आहे त्या गर्भवती महिलांचा पाठलाग करून त्यास प्रस्तुत काळी पुत्र झाला असे ऐकले असता लगेच त्या अर्भकाचा प्राण घेऊन नायनाट केला आहे हे हकीगत भट ब्राह्मणांच्या ग्रंथात आढळते.हे त्यांनी लिहून ठेवले आहे कुकर्माची सुद्धा एक परिसीमा असते.त्यावेळची वास्तविकता वाचून डोळ्यात अश्रू येतात.क्षत्रिय पुरुष,लहान मुले व गर्भवतीचा पाठलाग करून क्रूरपणे हत्या करणारा परशुराम कोणत्या मानव जातीचा आदर्श असेल त्याला आदर्श मानणारे व महात्मा फुले यांच्या चित्रपटास विरोध करणारे त्यावेळचे युरेशियन ब्राम्हण व आत्ताचे ब्राम्हण एकच आहेत.हे बहुजन समाज म्हणजे मराठा,कुणबी,OBC,SC/ST यांनी वास्तव समजून घेऊन परकियांच्या भट ब्राम्हणाच्या गुलामगिरीतून आपल्या बंधवास मुक्त केले पाहिजे त्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपर्याय नाही.

आपण आज ही गुलाम आहोत का ? एक शहाणा माणूस 10 अज्ञानी मनुष्याचे मन आपणाकडे वळवून त्यास तो आपल्या ताब्यात ठेवू शकतो आणि दुसरे असे की 10 ज्ञांनी मनुष्य जर एकाच मताचे असते तर त्यांनी त्या शहाण्या मनुष्याचे काहीच चालू दिले नसते परंतु ते 10 वेगळ्या मताचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यास त्यांना फसवण्यात काहीच अडचण पडत नाही त्याचप्रमाणे शूद्र अतिशूद्र एकमेकास मिसळू नये म्हणून पूर्वी भट लोकांनी एक मोठा धूर्त विचार शोधून काढला बहुजन समाज जास्त आहे व त्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे भट लोकास भीती वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा कसा राहील अशी तजवीज केली तरच आपल्याला इथे राहण्यासाठी सदा सर्वदा अडचण नसणार आहे हे त्यांनी ओळखले आहे .

वंशपरंपरेने आपले वंशाचे गुलामगिरीत हा बहुजन समाज असणे त्यांच्यासाठी IMP गोष्ट आहे.काही श्रम न करता त्यांच्या घामाने मिळवलेले उत्पन्नावर बिनधास्त मोज मारता येइल हा त्यांचा विचार आहे.या विचारासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज,महात्मा फुले यांची बदनामी करतात.कृष्णाजी कुलकर्णी, आणांजी,दत्तोजी,जेम्स लेन,भांडारकर केंद्र,बाबा पुरंदरे,संभाजी भिडे,सोलापूरकर, कोरटकर अगदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असे कितीतरी नावे आहेत.

जातीभेताचे थोतांड,खोट्या जातक कथा,वेद, उपनिषदे,ग्रंथ व देवाची भीती उत्पन्न करून सोवळे नेसून पंढरपूर च्या विठ्ठल मंदिरात कुंडात मुतून तीर्थ म्हणून बहुजन समाजास देतात.

देशात इंग्रज सरकार आल्यामुळे शृद्रादी अतिशूद्र भटाच्या दहशतवापासून मुक्त झाले खरे परंतु आम्हा सांगण्यास मोठे दुःख वाटते की अद्याप आमचे दयाळू सरकारचे शुद्रा विषयी दुर्लक्ष असल्यामुळे हे अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथाच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत. सरकार जवळ न्याय देण्याचे भान राहिले नाही.
आज ची भट व्यवस्था बहुजन समाजास लुटून खाते आहे.
मानसिक व शारिरीक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यशिवाय आम्हाला पर्याय नाही.धर्म,कर्म,नीती आचरण हे सर्वस्वी महात्मा फुलेंच्या विचाराने करावे मग चमत्कार बघा येथील व्यवस्था तडपडून जीव सोडल्याशिवय राहणार नाही.
जे पेराल तेच उगवेल

जय ज्योती जय क्रांती…!

Tags: Kumar londheMahatma fule jayantiकुमार लोंढे लेख महात्मा फुलेमहात्मा फुले लेख

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .