निरा नरसिंहपुर: दिनांक-8,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे
साप्ताहिक इंदापूर टाईम्स वृत्तपत्राचा २ रा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बावडा येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमावेळी इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच कार्यक्रमा प्रसंगी इंदापूर तालुक्यातील बहुसंख्येने पत्रकार बांधव देखील उपस्थित होते. कार्यक्रमावेळी साप्ताहिक इंदापूर टाईम्स च्या वतीने राजकीय, सामाजिक ,क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि आरोग्य व बांधकाम मा. सभापती प्रविणभैय्या माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्ष स्थानी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक पुणे जिल्हा आर पी आय(आठवले) पक्षाचे शिवाजीराव मखरे होते. यावेळी उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर टाईम्सचे संपादक राकेश कांबळे यांनी केले, यावेळी राकेश कांबळे यांनी बोलताना इंदापूर टाईम्स च्या यशावर प्रकाशझोत टाकत कार्यक्रमाचा घेण्याचा मानस व उद्देश सांगितला. एक व्यावसायिक ते राजकारणी ते एका साप्ताहिका सारख्या वृत्तपत्राचा संपादक व प्रकाशक म्हणून भूमिका निभावतानाकिती अडचणी व संकटांना तोंड द्यावे लागले याचा रंजक प्रवास सांगितला. राकेश कांबळे पुढे म्हणाले कि, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे . परंतु काही लोकांच्या चुकीच्या गोष्ठीमुळे पत्रकारिता बदनाम झाली आहे. परंतु तरीसुद्धा सर्वांनाच दोषी मानता येणार नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
राकेश कांबळे पुढे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक मिळवायचा असेल त्यास राजकीय आश्रय असणे गरजेचे असते. तसा इंदापूर टाईम्स वृत्त्पात्रालाही मिळाला आणि उत्तम उदाहरण म्हणून इंदापूर टाईम्स वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. परंतु असे असले तरी कोणाचेही मांडलिक न होता पत्रकारितेच्या माध्यमातून बातमीच्या सतत्येबाबत विविध अंगे जाणून घेऊन बातमी प्रसारित करणे अपेक्षित आहे. आणि त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रासाठी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी भविष्यात पत्रकारिता हे क्षेत्र करियर म्हणून मैलाच दगड ठरेल यात शंका नाही.
या कार्यक्रमाप्रसंगी सोनाई समूहाचे प्रविणभैय्या माने, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील, आर पी आय पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, आर पी आय पक्षाचे माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे , इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील आदींची भाषणे झाली.
प्रविणभैय्या माने भाषणात म्हणाले राकेश कांबळे यांनी स्वकर्तुत्वावर पत्रकारिता क्षेत्रात स्वत:ची ओळख तयार केली आहे. राकेश कांबळे यांचे वाडवडिलांपासून सर्व कुटुंब उच्च शिक्षित असून कोणतीही पार्श्वभूमी नसताना पत्रकारिता क्षेत्रात काम करणे सोप काम नाही. राकेश कांबळे हे सरळ स्वभावाचे व्यक्ती असून त्यांनी स्वार्थ साधण्याच्या हेतूने कधीच बातमी केली नाही. परंतु त्यांच्या कामामध्ये आमचा त्यांना नेहमी पाठिंबा राहील. आणि ज्या ज्या वेळी इंदापूर टाईम्स वृत्तपत्राला आमची गरज वाटेल त्या त्या वेळी सहकार्य करू असे सांगत तालुक्यातील सर्वच पत्रकारांना सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासित करून इंदापूर टाईम्स वृत्तपत्राला शुभेच्छा दिल्या.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी वृत्तपत्रे (प्रिंट व इलेक्ट्रोनिक मिडिया ) आज विविध विकारांनी पोखरला जात आहे . सामाजिक प्रबोधन व परिवर्तनाची प्रभावी साधने असणारी वृत्तपत्रे आज दिवसेंदिवस अशक्त व रोगग्रस्त बनत चालली आहेत. बहुसंख्य मीडियाची साधने आज भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनलेली आहेत. आज अनेक पत्रकारांच्या मनात इच्छा असूनही सडेतोड, स्पष्ट, वास्तव लिहिण्यास त्यांची लेखणी धजावत नाही. एखाद्या कार्यक्रमाची, घटनेची , सण-समारंभाची बातमी देणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, पत्रकारितेत चौफेर वाचन, त्या वाचनावरील मनन- चिंतन आणि विविध विषयांची अद्ययावत माहिती जमा करून विशलेषणात्मक लेख, सदर, स्फुट लेखन करता आले पाहिजे. आम्ही साप्ताहिक इंदापूर टाईम्स वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘कोण मांडणार आमचे प्रश्न’ ह्या काल्पनिक सदर मधून काल्पनिक पात्रे उभी करून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. या सदरामुळे इंदापूर टाईम्स वृत्तपत्राची अफाट लोकप्रियता वाढली.
यानंतर श्रीकांत कदम, शिवाजीराव मखरे, मिलिंद सरतापे आपल्या भाषणात इंदापूर टाईम्स वृत्तपत्राचे व कामाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. भविष्यात मोठा भाऊ म्हणून आम्ही नेहमी आपल्या पाठीशी राहू अशी कौतुकाची थाप देखील दिली.
अध्यक्षीय भाषणात मयुरसिंह पाटील म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे आपल्याकडे पत्रकारांना विशेष महत्व आहे. बातमीच्या अनुषंगाने दररोज अनेक लोकांशी शत्रुत्व घ्यावे लागते त्यामुळे पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे पत्रकारांना पत्रकार भवनाच्या माध्यमातून हक्काच्या छत हवे आहे आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय स्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे असे सांगायला विसरले नाहीत. यावेळी मयुरसिंह पाटील यांनी इंदापूर टाईम्स वृत्तपत्राला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमा प्रसंगी बावडा गावचे विद्यमान सदस्य आणि सहकार महर्षी सा.का.अकलूज चे संचालक श्री. महादेवराव घाडगे, भैरवनाथ विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री सुरेश शिंदे सर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष श्री.महारुद्र पाटील, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन विजय घोगरे, राधिका व विराट अग्रोचे श्री. उमेश सूर्यवंशी, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन श्री. ज्ञानदेव बागल गुरुजी, नीरा भीमा स.सा.का.चे विद्यमान संचालक श्री. उमेश पाटील, किसान कृषी सेवा केंद्राचे अस्लमभाई मुलाणी,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इन्नुस मुलाणी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सत्तार मुलाणी, मातंग एकता आंदोलन संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष श्री. शरद गायकवाड, सराटीचे उपसरपंच श्री. सचिन कोकाटे पाटील, प्रगतशील बागायतदार श्री. महादेव शिंदे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक चव्हाण , बावडा ग्रा.पं. सदस्य संतोष सूर्यवंशी, यशवंत सोसायटीचे चेअरमन श्री, हरिभाऊ बागल, कायदेविषयक सल्लागार अॅड. कमलाकांत तोरणे, शेतकरी नेते श्री. विजय गायकवाड, इंदापूर नं प. चे नगरसेवक श्री. अशोक मखरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल मुळीक, सामाजिक कार्यकर्ते समदभाई सय्यद, आरपीआयचे पुरंदर तालुकाध्यक्ष श्री. बळीराम सोनवणे, आरपीआय माळशिरस तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, आरपीआयचे इंदापूर शहराध्यक्ष श्री. अमोल मिसाळ, शहर सरचिटणीस श्री. प्रविण मखरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. कालिदास माने, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. पवन घोगरे, भाजपचे इंदापूर तालुका सरचिटणीस श्री. सचिन सावंत, बावडा ग्रा.पं. माजी सदस्य श्री.मुनीर अत्तार, माजी बावडा ग्रा.पं. सद्स्यू समाधान कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विक्रांत घोगरे, बावडा ग्रा.पं. उपसरपंच श्री.रणजीत घोगरे, युवा नेते व उद्योजक श्री. मनोज जगदाळे, इंदापूर तालुका शिवसेना समन्वयक श्री. अरुण पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. पांडुरंग कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सतीश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मोहिते,सामाजिक कार्यकर्ते अमोल पवळ, सदानंद वाघमोडे, आदी मान्यवर उपस्थित होते
तसेच दै.पुढारीचे पत्रकार राजेंद्र कवडे -देशमुख , दैनिक सकाळचे पत्रकार शौकतभाई तांबोळी व पत्रकार दीपक शिंदे, दै. पुण्यनगरी पत्रकार संतोष भोसले, दै.जनप्रवासचे इंदापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार शिवाजी times tv मराठी न्यूज चॅनलचे संपादक डॉ. सिद्धार्थ सरवदे , बेधडक मुद्याच बोला युट्युब चॅनलचे पत्रकार कैलास पवार, महाराष्ट्र लोकन्यूज युट्युब चॅनलचे पत्रकार सतीश जगताप, दै.लोकमतचे पत्रकार उदय देशमुख, महासंग्राम युट्युब चॅनलचे पत्रकार धनाजी शेंडगे, विश्व २४ युट्युब चॅनलचे पत्रकार अतुल सोनकांबळे, दै. जनप्रवास चे बावडा प्रतिनिधी पत्रकार गणेश कांबळे, पत्रकार राहुल बोबडे आदी पत्रकार बांधव कार्यक्रमास उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदापूर टाईम्स चे संपादक श्री.राकेश कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृत्तनिवेदिका कु.सृष्टी पवार यांनी केले तर कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कवडे देशमुख यांनी मानले.
