ज्येष्ठ पत्रकार बी.टी.शिवशरण,श्रीपूर.
जखड बंद पायातील साखळदंड
तडातड तुटले तु ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे..

मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या पासून संपूर्ण भारतातील भिमनगर चे मोहल्ले गाव वस्त्या वाड्या शहरे खेडोपाड्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बैठका नियोजन तयारी कार्यक्रमाची रुपरेषा व जयंती कार्यकारिणी नेमण्याची घाई सुरू झाली आहे ज्यांच्या हजारो पिढ्या अन्याय अत्याचार कर्मठ रुढी परंपरेच्या जोखडात अडकवण्यात आल्या होत्या त्यांचे माणूसपण नाकारण्यात आले होते स्वाभिमान हक्क स्वातंत्र्य यांवर सुरुंग लावून जगणे उध्वस्त केले होते कुत्र्याला मांजराला किंमत होती पण दलितांना नव्हती ज्यांच्या जगण्यातील श्वास कोंडला होता अशा दलित समाजात एक सूर्य जन्माला आला व बुध्दी व ज्ञान वैभवाने दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं ते युगपुरुष महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाते आपल्या जगण्याला अर्थ निर्माण करणारे युगंधर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली जाते या साठी संपूर्ण देशभरात भिमनगर मध्ये उत्साह चैतन्य उर्जा निर्माण झालेली पहायला मिळते दसरा दिवाळी पेक्षा कित्येक पटीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याची स्पर्धा व उत्साह संचारललेला असतो घरात पंच पक्वान्न गोडधोड केले जाते घरातील सर्वांना नविन कपडे खरेदी केले जातात महिला भगिनी आपली घरं दारे स्वच्छ करून रंगरंगोटी करण्यात व्यस्त असतात जयंतीनिमित्त पै पाहुणे तसेच सासरी गेलेल्या लेकी बाळी माहेराला आनंदाने येत असतात एकंदरीत आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे वेध सर्वांना लागून राहिले आहेत जयंतीनिमित्त भव्य मिरवणुका बौध्दीक व्याख्यानमाला स्पर्धा घेतल्या जातात अखिल विश्वात एकमेव महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर असे आहेत केवळ आणि केवळ फक्त त्यांचीच जयंती मोठ्या उत्साहात जगातील प्रत्येक गावात शहरात खेड्यात मोहल्लयात साजरी केली जाते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लाखोंनी गाणी लिहिली आहेत म्हटली जातात पुस्तके ग्रंथ नाटक चित्रपट पोवाडे म्हटले जातात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या या युगप्रवर्तक महामानवाला कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी त्यांची चौदा एप्रिल रोजी जयंती म्हणून साजरी केली जाते दलित बहुजन अठरा पगड जातींसाठी च नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आपलं तन मन धन वैचारिक बौद्धिक ज्ञानाची शिदोरी देऊन जनकल्याण साधणारा हा दृष्टा महापुरुष पुस्तकात ग्रंथात काव्यात चित्रात निसर्गात तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात न मावणारा थोर विज्ञानवादी समतावादी राज्यशास्त्र समाजशास्त्र इतिहास घडवणारा मसिहा होता एका कविने म्हटले आहे कोणाचा जन्म कोणास काय देऊन गेला
भीमा तुझा जन्म आम्हांस न्याय देऊन गेला