मोडनिंब (प्रतिनिधी)
माजी मंत्री तथा शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत प्रणित रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सागर खोत तर रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्षपदी प्रा. सुहास पाटील यांची निवड करण्यात आली. रयत क्रांती संघटनेची पुणे येथे जाधववर इन्स्टिट्यूट मध्ये विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये संघटना व पक्ष प्रदेशाध्यक्षांच्या निवडी सोबतच विभागीय अध्यक्ष यांच्याही नियुक्ती करण्यात आल्या. शेतकरी चळवळीमध्ये सदाभाऊ खोत गेली ३० वर्ष सातत्याने काम करीत आहेत. त्यांनी २०१७ मध्ये रयत क्रांती संघटना या शेतकरी संघटनेची स्थापना केली. पुढे रयत क्रांती संघटनेचा विस्तार आज जवळजवळ २६ जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. या विस्तारित राज्य कार्यकारणी मध्ये रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सागर खोत यांची नियुक्ती करण्यात आली, तर रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्षपदी प्रा. सुहास पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली. सुहास पाटील हे गेली १३-१४ वर्ष पासून शेतकरी चळवळीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा कामाचा ठसा उभा करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देणे व सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांनी आजपर्यंत केलेले आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब रुग्णांसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी आज पर्यंत त्यांच्या प्रयत्नातून रुग्णांना उपचारासाठी मिळालेला आहे. या संपूर्ण कामाची दखल घेऊनच प्रा सुहास पाटील(सोलापूर )यांची रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या राज्य कार्यकारणी मध्ये राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले(पंढरपूर), राज्य कोअर कमिटी अध्यक्ष डॉ. डी एन चौगुले(सांगली), महिला प्रदेशाध्यक्ष ललिता लोलगे(कोल्हापूर), युवती प्रदेशाध्यक्ष प्रियाताई लोडम(अकोला), युवा प्रदेशाध्यक्ष अरविंद पाटील(वाशिम), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गजानन गांडेकर(पुणे), पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमोल वेदपाठक(सोलापूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मीक सांगळे(नाशिक), मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवाजी पेठे(लातूर ),मराठवाडा विभागीय युवा अध्यक्ष गजानन राजबिंडे(जालना) आदींच्या नियुक्ती करण्यात आल्या. चौकट-रयत क्रांती संघटना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर रयत क्रांती पक्ष पक्षाची बांधणी करणार आहोत. शेतकरी चळवळीतील नेतृत्वच पुढे भविष्यात दिशादर्शक ठरणार आहे. प्रा. सुहास पाटील. रयत क्रांती पक्ष प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.


