
संविधानाची शपथ घेऊन संसद भवनांमध्ये लोकांचे प्रश्न, लोकांच्या व्यथा, वेदना मांडण्यासाठी अमित शहा व अशा अनेक खासदारांना निवडून जावे लागते आहे परंतु हे खासदार लोकांच्या प्रश्नावर आक्रमक न होता सर्वसामान्य प्रश्नावर आक्रमक न होता इथल्या दलित एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीच्या प्रश्नावर आक्रमक न होता महात्मा फुले च्या भाषेत शेठजी भटजी आणि लाटजीच्या प्रश्नावर आक्रमक होतात. अदानी,अंबानीचे बूट आणि तळवे चाटून आम्ही किती तुमच्या प्रति वफादार आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न काहीजण करतात व या स्पर्धेत नम्बर वन कोण हे ठरवण्याचा केविलवाणी प्रयत्न करतात.
आज विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील परभणी येथे संविधान प्रतिकृती ची विटंबना होते.परभणी पेटते आहे.वडार समाजातील आमचा सोमनाथ सुर्यवंशी नावाचा भीमसैनिक पोलीस मारहाणीत कस्टडी मध्ये मृत्यमुखी पडतो.कोंबिंग ऑपरेशन मध्ये आया बहिणी व लहान मुले टार्गेट केली. रिअल पँथर विजय वाकोडे परभणी शांत करत असताना पोलीस त्यांना एक नंबर आरोपी करतात व त्यांचे हार्ट अटॅक ने मृत्यू होतो.बीड मध्ये सरपंच यांचे अपहरण करून टॉर्चर करून मर्डर होतो हे सर्व होत असताना अमित जी शाह आपण ब मधला ब्र ही काढला नाही किंवा राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारणा केली नाही कारण काय? हे आपणास माहीत देव जाणे… तुम्हाला स्वर्ग मिळेल का नाही या बद्दल आंबेडकरी समूहाच्या मनात शंका आहे अमीतजी….आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपला व्हिडिओ बघायला ऐकायला मिळाला .
आपण काय अकलेचे तारे तोडले..? आपण देशाचे गृहमंत्री आहात संविधानाची शपथ घेऊन गृहमंत्री झालेले आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलताना उपहासात्मक व डॉक्टर आंबेडकर म्हणजे एक फॅशन आहे असे आपण म्हणतात.समाजामध्ये फॅशन आहे सारखं आंबेडकर.. आंबेडकर .. आंबेडकर…असे फॅशन म्हणून लोक बोलतात ..असं बोलून आपण या भारतातील लाखो,करोडो लोकांचा अपमान केलेला आहे तुम्ही जर एवढे वेळा आंबेडकर म्हणण्याऐवजी देवाचं नाव घेतल असत तर तुम्हाला स्वर्ग नक्की मिळाला असता हे आपले बोलणं कितपत योग्य आहे.स्वर्ग तुम्हीच घ्या स्वर्गातील अफसरा पण तुम्हीच घ्या… आम्हाला फक्त डॉ.आंबेडकर हे नावच भरपूर आहे.संविधानाची शपथ घेऊन आपण देशाचे सर्वोच्च पद भूषवत आहात.हा आंबेडकरांच्या विचाराशी द्रोह नव्हे काय?त्यांच्या विचाराशी केलेली प्रतारणा नव्हे काय ? या प्रकरणाबद्दल आपण जाहीर रित्या माफी मागावी. डिअर अमित जी…..गुजरात मध्ये आपण काही उद्योग केलेत किती ठिकाणी आपल्यावर केसेस होत्या आणि आपल्याला का तडीपार केलं कोणाकोणाचे तुम्ही बळी घेतले ?किती लोकांना पायाखाली दाबलं हे लोकांना माहीत आहे माझी आपणाला विनंती आहे की आंबेडकर काल आज नी उद्या आमच्या करीता श्वास आहेत…असतील ….करोडो लोकांचा श्वास हे आंबेडकर आहेत ……अमित शहाजी आपण तोंडावर लगाम घालावा आणि भाजपाने त्यांना योग्य तो समज द्यावा कारण अशा लोकांमुळेच या देशांमध्ये अराजकता निर्माण होत आहे शेठजी भटजी आणि लाटजींना आंबेडकरांचे महत्त्व नसेल ही पण समाज व्यवस्थेतील शेवटच्या व्यक्तीला आंबेडकरांशिवाय पर्याय नाही .आंबेडकर म्हणजे आमच आयुष्य आहे चालत बोलत विद्यापीठ आहे .आंबेडकर आमच्या श्वासात हृदयात नसा-नसात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात असतील हे अंतिम सत्य आहे. डिअर अमितजी…. आपले सारखे तडीपार लोक गृहमंत्री होतात ही डॉ.आंबेडकरांची किमया आहे अमितजी शहा…! आपण तडीपार होता आणि तडीपार असल्याचा धब्बा आपण देशाचे गृहमंत्री जरी असला तर कायम आपल्यावर राहणार आहे. आपण डॉ.आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक व्हावे, नाक रगडून समस्त जनतेची व भारतातील लाखो करोडो लोकांची माफी मागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करावं अन्यथा येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही.डॉ.आंबेडकर का नाम ही हमारा सर्वस्व है…आमचं आयुष आंबेडकरांच्या नावावर आहे.. डिअर लव्हली अमितजी शाह..!