बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा :covid चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन निर्णय
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने बारावी (१२ वी) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखेबाबत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिपत्रक काढून राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.
अगोदरच्या परिपत्रकात १५/१२/२०२० ते ०४/०१/२०२१ नियमित शुल्कासह आवेदन पत्रे सादर करण्याची मुदत होती परंतु या निर्णयाने खाजगी,पुनपरिक्षार्थी व नियमित विद्यार्थांना ०५/०१/२१ ते १८/०१/२०२१ पर्यत www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर आवेदन पत्रे भरता येतील.तसेच चलनाद्वारे बँकेत शुल्क भराव्याची तारीख १५/१२/२०२० ते २५/०१/२०२१ पर्यंत असणार आहे
या निर्णयामुळे विद्यार्थी पालक व शाळा यांना दिलासा मिळाला आहे.कोव्हीड चा प्रादुर्भाव लक्षात घेता मंडळाचा निर्णय स्वागतार्ह आहे.