श्रीपूर प्रतिनिधी,
महाराष्ट्रातील शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न व त्यांच्या विविध मागण्या पैकी राज्यातील चौदा ऊस मळ्यातील सर्व रहाण्याचा प्रश्न मोठा बिकट होता कामगारांना रहाण्यासाठी दोन गुंठे जागा देण्यात यावी ही मागणी शेती महामंडळ कामगार संघटना यांनी शासनाकडे केली होती. या संदर्भात गेल्या आठवड्यात श्रीपूर मध्ये शेती महामंडळाच्या कामगारांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी आरपीआय आठवले गटाने शेती महामंडळाच्या कामगारांच्या सर्व मागण्यांसाठी सशर्त पाठिंबा दिला व शेती महामंडळाच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआय आठवले गट राज्यात मोठे आंदोलन उभे करेल तसेच मागण्या मान्य करण्यासाठी राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा धरणे आंदोलन निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची गंभीर दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घेतलेल्या मुंबईत बैठकीत शेती महामंडळ कामगारांना रहाण्यासाठी दोन गुंठे जागा देण्याचे जाहीर केले. श्रीपूर मध्ये घेतलेल्या मेळाव्यात कामगारांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले आरपीआय आठवले गट, प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण धाईंजे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, बी टी शिवशरण, राजू शेंडगे, गौतम आठवले, आबा कांबळे इत्यादी उपस्थित होते .
आरपीआय आठवले गट यांनी राज्यसरकारला दिलेल्या इशारा मुळे आज शेती प्रशिक्षणाच्या कामगारांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आरपीआय आठवले गट प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण धाईंजे यांनी दिली.
