श्रीपूर प्रतिनिधी,
श्रीपूर मधील भाजी विक्रेत्यांनी भाजी मंडईत नेहमीची जागा सोडून अचानक जागा बदलली त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागला आहे.
नविन जागेत भाजी खरेदी करताना दोन्ही बाजूला विक्रेते बसले होते त्यामुळे ग्राहकांना चालताना, खरेदी करताना अडचणी आल्या. विक्रेत्यांना या बाबत विचारले असता जुन्या जागेत पावसा मुळे चिखल झाल्यानं आम्ही इकडे बसलो आहोत असे म्हटले.
वास्तविक पहाता न बसण्या इतपत चिखल किंवा दलदल झालेली दिसत नाही.
फोटोत जुन्या जागेचा फोटो आहे व नवीन जागेत भाजी विक्रेते यांनी कशी दाटी केलेलीं आहे हे लक्षात येते.
नगरपंचायत यांनी या बाबत लक्ष देऊन शिस्त लावण्याची गरज असल्याचे ग्राहक चर्चा करत होते.
नगरपंचायतीने या कडे विशेष लक्ष देऊन शिस्त मोडणारे विक्रेत्यांना समज दिली पाहिजे.
