श्रीपूर प्रतिनिधी,
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत हद्दीतील सर्व वार्डातील विकासकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतचे नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.
यामध्ये स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती बांधकाम, महापुरुषांचे नावाने स्मारक, समाज मंदिर, बुध्द विहार, सांस्कृतिक भवन, नगरपंचायत अंतर्गत रस्ते, गटारी काही भागात बगीचा यासाठी मुख्यमंत्र्यांनी नगरपंचायतला दहा ते पंधरा कोटींची विकासकामे करण्यासाठी स्पेशल बाब म्हणून निधी मंजूर करावा असे लेखी निवेदन दिले आहे.
निवेदन मुख्यमंत्र्यांचे कार्यालयीन अधिकारी यांनी स्विकारून ते मुख्यमंत्र्यांकडे देतो असे आश्वासन दिले आहे.
महाळुंग पाच नंबर वार्डातील स्मशानभूमीची दुरुस्ती देखभाल महाळुंग मायनर पारधी वसाहती नजीकच्या स्मशानभूमी, महाळुंग गट नंबर दोन साठी स्वतंत्र स्मशानभूमीचे बांधकाम या साठी स्वतंत्र जागा खरेदी करून स्मशानभूमीचे बांधकाम, तसेच श्रीपूर विकास नगर येथील स्मशानभूमी यासाठी प्रत्येकी पंचवीस लाख रुपये तसेच स्थानिक पातळीवर अंतर्गत सिमेंट रस्ते भुमीगत गटारी बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी तसेच नगरपंचायतचे प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी पाच कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, महाळुंग मध्ये महाविद्यालय सुरू करण्यासाठी मंजुरी हे व इतर काही अन्य विकास कामे करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
महाळुंगचे नेते अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईला निवेदन दिले आहे.
