प्रतिनिधी,
मोडनिंब परिसरामध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतातील बांध बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .सर्व शेतकरी वर्ग शेतीच्या कामाला लागला आहे.
मोडनिंब च्या ओढ्याला पाणी आल्यामुळे यात्रेतील पाळणा वाल्यांचे अतोनात हाल झाले असून पाण्यातील वाहून चाललेले सामान काढण्यासाठी त्यांची मोठी कसरत करावी लागत आहे. वाहत्या पाण्यातून त्यांचे समान बाहेर काढण्यास ग्रामस्थ मदत करत आहेत.
पावसाचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहत आसल्याने त्यामध्ये ज्या दोन मोटार सायकली वाहून गेल्या होत्या त्या स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले.



करकंब व मोडनिंब ला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले व त्यामुळे रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता.