नरसिंहपुर: दिनांक-5,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
महाराष्ट्रातील बारामती लोकसभा निवडणुकीकडे अख्ख्या देशाचे आणि राज्याचे लक्ष लागलेले होते .या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्राताई पवार यांच्यात लढत झाली .यामध्ये शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या.
हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रियाताई सुळे यांनी दिली.
या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे यांना मोलाची साथ देणारे हे सागर बाबा मिसाळ ,महारुद्र पाटील, भरत शेठ शहा ,आप्पासाहेब जगदाळे ,दत्तामामा घोगरे आणि कार्यकर्ते यांच्यामुळे सुप्रियाताई सुळे यांचा भरघोस मतांनी विजयी झाला. सुप्रियाताई सुळे या चौथ्यांदा संसदेमध्ये विजय होऊन गेल्या. सुप्रियाताई सुळे यांच्या कामाची पद्धत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची पद्धत यामुळे सुप्रियाताई सुळे या विजय झाल्या. ताईंच्या याच कार्यामुळे जनतेने त्यांना चौथ्यांदा विजयी रुपी आशीर्वाद दिला आहे आणि त्यांचे काम हे असेच चांगले होवो अशा शुभेच्छा ही जनतेमधून दिल्या जात आहेत.
