भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी देशात काळी जादू, तसेच बळजबरीने केले जाणारे धर्मांतरण यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.
या याचिकेवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे .
काय म्हटले सर्वोच्च न्यायालयाने ?
▪️ काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की १८ वर्षांवरील प्रौढ व्यक्ती तिला हवा तो धर्म निवडू शकते.
▪️ तसेच न्यायालयाने म्हटले आहे कि प्रत्येक व्यक्ती धर्म आणि जोडीदार निवडीबाबत , स्वतःच अंतिम न्यायाधीश असते.
▪️ म्हणजे याबाबतीत , कोणत्याही व्यक्तीच्या आवडीनिवडीत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
