दि. 12/3/2022 रोजी 12.45 वाजता दीर्घ आजाराने राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे दुःखद निधन झाल्यानंतर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला,अनेक कार्यकर्ते अंत्यविधीसाठी रवाना झाले तर अनेक कार्यकर्त्यांनी कार्यालयात माईंना आदरांजली वाहिली.
आज (दि. 13 रोजी) सकाळी दहा वाजता त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस हजारोच्या संख्येने प्रहार सेवकानी आपली उपस्थिती नोंदवली. तर काही प्रहार सेवकानी आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
माळशिरस तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्याचे दत्ताभाऊ मस्के पाटील, संजीवनीताई बारंगुळे, अजय भाऊ कुलकर्णी, संतोष भाऊ पवार, संदीप भाऊ तळेकर, सागर भाऊ पवार, महेश धोत्रे, समाधान हेमाडे, शहाजी बापू देशमुख, संजय भाऊ पवळ, गोरखभाऊ जानकर, धनाजी भाऊ जाधव, संभाजी गावडे, मंगेश इंगोले, रामचंद्र माने, यादव, पिंटू भोसले, कमलबाई पवळ, वनिता ताई पवळ, अर्चना ताई सावंत, शेतकरी संघटना दता भाऊ भोसले, रयत संघटनेचे लक्ष्मण तात्या गोरड, रनू मिसाळ, दादा गुरव परिवार, सुहास सावंत, प्रहार चालक-मालक संघटना माळशिरस तालुका सर्वांच्या समुहाने प्रहार माळशिरस संपर्क कार्यालयामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.