🔅४ मार्च पासून नवे नियम🔅
राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार १४ जिल्ह्यांचा ‘अ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
आणि या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.


या मध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या जिल्ह्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सरकारी आणि खासगी कार्यालयात १०० टक्के उपस्थितीची परवानगी, तसेच शाळा पूर्ण क्षमतेने आणि पूर्णवेळ सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
लग्नसमारंभ तसेच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले गेले आहेत.
तसेच या जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील, असं या नियमावलीत म्हटलं आहे.
🔅 निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने काही निकष ठरवले आहेत.🔅
त्यानुसार सुरवातीला राज्य सरकारने मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर , रायगड, वर्धा ,रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या १४ जिल्ह्यांना ‘अ’ श्रेणीत टाकलं आहे.
⭕ वरील १४ जिल्ह्यांना ‘अ’ श्रेणीत टाकण्यासाठी शासनाने खालील निष्कर्ष वापरले आहेत. ⭕
● ‘अ ‘श्रेणीतील जिल्ह्यात ९० टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर ७० टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे.
● तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे. तसेच ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा आयसीयूतील बेडची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
अशाच जिल्ह्याचा या १४ जिल्ह्यामध्ये समावेश केला गेला आहे.