श्रीपूर येथील ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांनी सुरू केलेल्या पत्रकारितेला तेहतीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी सकारात्मक वैचारिक पत्रकारिता केली. त्यांनी आपल्या लिखाणातून कधीही कोणाचा अवमान होईल असे लिखाण केले नाही. त्यांची दमदार कारकीर्द साप्ताहिक गस्त मध्ये वार्ताहर ते उपसंपादक कार्यकारी संपादक संपादक अशा चढत्या आलेखात झाली आहे. सामाजिक राजकीय सांस्कृतिक विधायक वैचारिक मंथन करणारी समतोल साधणारे त्यांचे लिखाण असल्याने अत्यंत परखड सडेतोड लिखाणातून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण करुन समाजातील भेडसावणाऱ्या समस्या नागरीसुविधा सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी दमदार पत्रकारिता केली. त्यांची चार पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांना मुंबई वृत्तपत्र संघाचा दर्पण पुरस्कार, तसेच शिवछत्रपती वाचनालय दसूर यांचा आदर्श पत्रकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार बार्शी येथील सितादेवी सोमाणी प्रतिष्ठान, तसेच अमरावती येथील महानुभाव संस्थेचा महानुभव पुरस्कार लोकनेते राजाभाऊ सरवदे सन्मान पुरस्कार, नुकताच मुकनायक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या आंदोलनाचा भडका या पुस्तकाचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळाल्याचे पोलिस प्रशासनाने कौतुक केले आहे. त्या पुस्तकाचे संदर्भात अनेक साप्ताहिक मासिकांचे संपादकांनी बी टी शिवशरण यांच्या पत्रकारितेवर निर्भिड लिखाणावर अग्रलेख लिहिले आहेत. साप्ताहिक गस्त, दिवाळी अंक, दर्जेदार उत्कृष्ट प्रबोधन वैचारिक साहित्य राष्ट्र पुरुषांवर विशेष दिवाळी अंक काढले. या दर्जेदार दिवाळी अंकाचे राज्य पातळीवर अनेक मान्यवरांनी कौतुक केले व दखल घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी दोन हजार लेख अनेक विषयांवर वार्तांकन समीक्षा यांवर लिखाण केले आहे. अनेक सामाजिक विधायक राजकीय सांस्कृतिक विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यांनी मुंबईत नवाकाळ, नवशक्ती, मुंबई सकाळ, आपल महानगर मुंबई, सांजदिनांक या वर्तमानपत्रात लिखाण केले आहे. त्यांचे लिखाणावर प्रभुत्व आहे. कोणत्याही विषयावर ते सहजपणे लिहू शकतात. त्यांच्या पत्रकारितेला तेहतीस वर्षे पूर्ण होत आहेत.
