श्रीपूर.
महाळुंग (भगत वस्ती )येथील आंबेडकर चळवळीतील एक कणखर निर्भिड कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या कुसुमताई श्रीपती कांबळे यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.
त्या अन्याय अत्याचार विरोधात पुढं येऊन लढणारी रणरागिणी म्हणून चळवळीत ओळखल्या जात होत्या.
त्या अशिक्षित होत्या परंतु सामाजिक राजकीय तसेच चळवळीचे त्यांना उपजत ज्ञान होते.
माळशिरस तालुक्यातील अनेक विषयांवर झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता.
त्या अँड. प्रकाश आंबेडकर यांचे वंचित बहुजन आघाडीचे काम करतं होत्या . त्यांनी पहिल्या पासून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे विचारधारेला प्रमाण मानून शेवटपर्यंत त्यांचेच नेतृत्व स्वीकारले होते. कांबळे बाई म्हणून त्या माळशिरस तालुक्यात प्रसिद्ध होत्या. त्यांनी जातीवादी सनातनी प्रवृत्ती विरोधात मोठ्या धाडसाने लढा दिला होता. जातीवादी कर्मठ लोकांना त्यांनी कायद्याच्या चौकटीत धडा शिकवला होता.
त्यांचे वैशिष्ट्य असे की त्या स्वाभिमानाने गरीबीत जगल्या प्रसंगी चटणी भाकरी खाऊन दिवस काढले, पण त्या कुणापुढे लाचार होऊन झुकल्या नाहीत. त्या जिथं रहात होत्या तिथे फक्त त्यांचे दलिताचे एकच घर आहे बाकी सर्व सवर्ण लोक आहेत.
तेथे त्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असत. हातात निळा झेंडा घेऊन आपल्या दमदार आवाजात जयभीम ची गर्जना करत बैलगाडीतून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची परिसरातुन त्यांनी मिरवणूक काढली आहे.
आंबेडकरी चळवळीतील आक्रमक लढाऊ एक झुंजार रणरागिणी चे निधन झाल्याने माळशिरस तालुक्यातील दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
