आंबेडकरी चळवळीतील महान गीतकार महान गायक सन्माननीय कालकथीत वामनदादा कर्डक यांनी आपल्या गाण्यांनी आंबेडकरी चळवळ गतिमान केली ,कार्यकर्त्यांना उर्जा दिली, समाजातील अंधश्रद्धा जातीयवादी प्रवृत्ती विरुद्ध आपल्या लेखणीतून फटकारले. ते थोर गायक गीतकार शाहिर वामनदादा कर्डक यांना आयुष्यात उपेक्षित जिवन जगावं लागलं याची कोणत्याच सरकारने दखल घेतली नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांनी आंबेडकरी जलसा चालवला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें कार्य त्यांचे विचार घराघरात पोहचवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कार्याचा स्त्रोत समाजातील घटकांपर्यंत पोहचवण्याचे महान काम वामनदादा कर्डक यांनी केले आहे.
त्यांच्या एका कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले होते त्यावेळी वामनदादा कर्डक यांच्या जलसा विषयी गौरवोद्गार काढताना बाबासाहेब म्हणतात “आमच्या शंभर जाहीर सभा शंभर व्याख्यान यापेक्षा वामनदादा कर्डक यांचे एक गीत प्रभावी आहे” एवढी त्यांच्या गीतांची ताकद मोठी आहे .
महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांस्कृतिक चळवळीत तसेच आंबेडकर यांच्या कार्याची उंची वाढवणारे वामनदादा कर्डक यांच्या महान थोरवीची दखल इथल्या प्रस्थापितांनी घेतली नाही ही खंत आजही मनाला अस्वस्थ करते . पैसे देणगी घेऊन खेळणारे गाणी म्हणणारे यांना भारतरत्न दिला जातो, पण ज्यांनी स्वतः पदरमोड करून समाज जागृती केली एक युग निर्माण केले जातीयतेच्या विरोधात लेखणी चालवली समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन केले आपल्या गीतातुन सामाजिक वैचारिक सांस्कृतिक लढा यशस्वी केला सदैव समाज राष्ट्र हित जोपासले असा महान गीतकार संगीतकार गायक यांना आयुष्याच्या वाटेवर दुर्लक्षित वंचित उपेक्षित ठेवले हा महाराष्ट्र पुरोगामी आहे कस म्हणता येईल .
महाराष्ट्र शासनाने वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे. आंबेडकरी चळवळीतील या क्रांतिकारक लढाऊ गीतकार गायक यांचा तो सन्मान ठरेल.