• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

अखेर एअर इंडियासाठीची बोली टाटा ग्रुपने जिंकली. एअर इंडिया टाटांच्या ताब्यात जाणार.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 1, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
अखेर एअर इंडियासाठीची बोली टाटा ग्रुपने जिंकली. एअर इंडिया टाटांच्या ताब्यात जाणार.

📌 निविदा आरक्षित रकमेपेक्षा तीन हजार कोटी ने जास्त

टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत होते. मात्र टाटा सन्सने दाखल केलेली निविदा हा सरकारने निश्चित केलेल्या आरक्षित रकमेपेक्षा ३ हजार कोटींनी जास्त होती असे कळते. टाटा सन्सकडून या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून तसेच एअर इंडियानेही या व्यवहाराबाबत अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.

📌 खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब

आर्थिक जगताचे लक्ष लागून राहिलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. एअरइंडिया आता पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात जाणार आहे. एअर इंडियाच्या विक्रीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी समितीने टाटा समूहाच्या निविदेला मंजूरी दिली. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, मंत्र्यांच्या पॅनेलने टाटा सन्सच्या बोली प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करत हा प्रस्ताव मान्य केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. एका अहवालाच्या आधारे ही माहिती दिली आहे.

📌 खाजगीकरण बाबत उलट सुलट प्रतिक्रिया

“एअर इंडियाचे खाजगीकरण करणे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या तोट्यात दाखवून सरकार बड्या उद्योगपतीच व भांडवलंदारच हित जोपासत आहे”
– ऍड धनंजय बाबर कायदेतज्ज्ञ

“एकीकडे आरक्षणाच गाजर दाखवायचे घटनादत्त अधिकार पायदळी तुडवायचे नाही रे वर्गास त्याच्या सत्ता,संपत्ती व जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवून सरकार शासक आहे की शोषक आहे याचं उदाहरण अधोरेखित करत आहे”
-डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन

📌अधिकृत घोषणा बाकी

याबाबतची अधिकृत घोषणा मात्र काही दिवसांनी होणार असल्याचे कळते. तसेच मनीकंट्रोल या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. टाटा सन्स तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सूत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. टाटा सन्सने दाखल केलेली निविदा हा सरकारने निश्चित केलेल्या आरक्षित रकमेपेक्षा ३ हजार कोटींनी जास्त होती असते कळते.

📌1932 मध्ये टाटांनी सुरू केली होती एअर इंडिया

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. टाटा समूहाचे जेआरडी टाटा हे त्याचे संस्थापक होते. ते स्वतः पायलट होते. तेव्हा या कंपनीचे नाव टाटा एअरलाईन्स असे होते. 1938 पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर सरकारने या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले आणि ती एक सरकारी कंपनी बनली.

📌सरकार का विकतेय एअर इंडिया? ७० हजार कोटींचा तोटा झाला आहे.

2007 साली सरकारने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलिनीकरण केले होते. इंधनाचे वाढते दर, खासगी विमान कंपन्यांकडून असणारी तगडी स्पर्धा यामुळे एअर इंडिया तोट्यात गेली. दरम्यान 2000 ते 2006 या काळात एअर इंडियाला मिळणारा नफा कमीच झाला होता. मात्र विलीनीकरणानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. कंपनीच्या डोक्यावरील कर्ज वाढत गेले. एअर इंडियाला आतापर्यंत तोट्यात असल्याने सदरचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

Tags: #Air India#cmomaharashtra#kumar londhe#ratan tata#reservation#Tata#एअर इंडिया#टाटा

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
लातूर ची कन्या कु.ऐश्वर्या चिकटे हिची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये निवड

लातूर ची कन्या कु.ऐश्वर्या चिकटे हिची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .