• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यातील लोह खदानी रद्द करा : शेकडो ग्रामसभांनी केली राज्यपालांकडे मागणी

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 20, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
गडचिरोली जिल्ह्यातील लोह खदानी रद्द करा : शेकडो ग्रामसभांनी केली राज्यपालांकडे मागणी

विकासाच्या नावावर लोह खदानी लादून उध्वस्त करण्याचे कारस्थान??

गडचिरोली : विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 20 जुलै 2021:-
भारतीय संविधानाच्या तरतुदी ,पेसा व वनहक्क कायद्यान्वये जल , जंगल , जमीन आणि संसाधनांच्या मालकी हक्कांना डावलून बेकायदेशीरपणे बळजबरीने गडचिरोली जिल्ह्यात खोदल्या जाणाऱ्या लोह खदानी तात्काळ रद्द करण्यात याव्यात , अशी मागणी जिल्ह्यातील ग्रामसभांनी राज्यपालांकडे जिल्हाधिकारी यांच्या माफ॔तीने केली आहे. जिल्ह्यातील ग्रामसभांचे खदानविरोधी नेते,जि.प.सदस्य सैनू गोटा,भाई रामदास जाते,अमोल मारकवार,जि.प.सदस्य अनिल केरामी, उपसभापती सुखराम मडावी,पं.स.सदस्य शिला गोटा, जयश्री वेळदा, मनोहर बोरकर, इजामसाय काटेंगे यांच्या नेतृत्वात सदरचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,पंचायत उपबंध अनुसूचित क्षेत्रावर विस्तार अधिनियम 1996 अन्वये आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रथा,परंपरा आणि न्याय निवाडा व जल- जंगल- जमीन आणि साधन संपत्तीचे रक्षण व जतन आणि व्यवस्थापन व नियोजन करण्यास तसेच विकास योजना आणि स्वशासन व्यवस्था चालविण्यास सक्षम आहोत.

तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता कायद्याच्या तरतुदींचीही ग्रामसभांव्दारे अंमलबजावणी सुरु आहे. अशा स्थितीमध्ये एटापल्ली तालुक्यातील सुरजागड परिसरातील बांडे, सुरजागड, दमकोंडवाही, गुंडजूर-मोहन्दी व गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आगरी, मसेली, झेंडेंपार तसेच इतर ठिकाणच्या संपूर्ण पंचेवीस लोह खनिजाच्या खदानींस मंजूरी देवून व प्रस्तावित करुन बळजबरी सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ग्रामसभांच्या देवांच्या पवित्र जंगलांमधून बांबू, तेंदू व इतर गौण वनउपजांच्या व्यवस्थापनातून तेथील ग्रामसभांना मोठ्या प्रमाणावर शास्वत रोजगार निर्माण झालेला आहे.तसेच तेथील देवांच्या पवित्र जंगलांतून उपजिविका व उदरनिर्वाह पारंपारिक रित्या ग्रामसभा करीत आहेत.त्यामुळे शासनाने स्थानिकांना रोजगार निर्मितीच्या नावावर तेथील जंगल व पहाडांमध्ये खदानी खोदून,तेथील पारंपारीक साधनसंपत्ती व जैविक विविधता नष्ट करु नये. सोबतच धार्मिक व पारंपरिक पुजास्थाने असतांना, शासन व कंपन्यांकडून कोणतीही खातरजमा न करता सदर ठिकाणी लोह उत्खननाची व पुर्वेक्षणाची मंजूरी दिली गेल्याने तेथील देव व देवांचे पवित्र डोंगर-पहाड व जंगल शासनाने खदानी करीता विकले. भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमात आदिवासींचे देव व देवांच्या पवित्र जागा विकणे किंवा त्या ठिकाणी खदानी खोदण्याची तरतुद नसतांनाही शासनाच्या विविध विभागांनी में.लाॅयड्स मेटल्स् ॲन्ड इंजिनिअर्स लिमी.मुंबई यांचेसह वर उल्लेखित कंपण्यांना आमच्या देव व देवांच्या जागा असलेले पवित्र डोंगर-पहाड व जंगल खदानी करीता विकलेले आहेत. सदरची बाब संविधान विरोधी, कायदे विरोधी तसेच धार्मिक व सांस्कृतिक प्रथा,परंपरा विरोधी असल्याने शासनाच्या संबंधीत विभागांनी एट्टापल्ली व कोरची तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित असलेल्या लोह खदाणी स्थानिक जनतेच्या प्रखर विरोधानंतरही जबरीने खोदण्याकरीता वरीष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. हा स्थानिकांना त्यांच्या घटनात्मक हक्क आणि अधिकारापासून वंचित करण्याचा प्रयत्न आहे करीता सदरची संपूर्ण मंजूरी प्रक्रीया तात्काळ रद्द करावी, असेही म्हटले आहे.
वरील मागण्यांचे निवेदन आमच्या स्थानिक ग्रामसभा आणि सुरजागड पारंपरिक इलाखा गोटुल समीतीच्या वतीने मानणीय राष्ट्रपती, मानणीय पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि संबंधित विभागांच्या सचिवांना मागील अनेक वर्षांपासून अनेकदा सादर करण्यात आले आहे. मात्र आमच्या या संघर्षाकडे शासकीय स्तरावरून वारंवार दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणा व सरकार आमच्या ग्रामसभा आणि आम्हा स्थानिक आदिवासींच्या खदानविरोधी पाठपुराव्याला कोणताही प्रतिसाद देत नसून उलट बळजबरी व कायदेभंग करुन खोदल्या जाणाऱ्या या खदानींना पाठबळ देत आहे, ही आमच्यासाठी दुःखदायक आणि खेदाची बाब आहे. त्यामुळे आपणास असलेल्या अधिकारान्वये दखल घ्यावी असे आर्जवही ग्रामसभांनी राज्यपालांकडे केला आहे.
निवेदन सादर करतांना सुरजागड(पुरसलगोंदी) च्या सरपंचा अरुणा सडमेक, जिल्हा परिषद सदस्य सैनुजी गोटा. उपसरपंच राकेश कवडो, माजी सरपंचा कल्पना आलाम,जवेलीचे सरपंच मुन्ना पुंगाटी,कोठीच्या सरपंचा भाग्यश्री लेखामी, धोडराजच्या सरपंचा सोनाली पोटामी, रायसिंग हलामी, प्रेमदास गोटा,जनिराम होळी,भकाराम मरसकोल्हे, मंगेश नरोटे,चिन्नू महाका,लक्ष्मण नवडी,दोहे हेडो,चुकलू दोरपेटी,दारसू तिम्मा,धर्मा तिम्मा,बिरजू गोटा, पत्तू पोटामी, विनू मट्टामी यांच्यासह ग्रामसभांचे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: #गडचिरोली#पुणे#मुंबई

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
पोलीस निरीक्षकाची दबंगशाही…??पदाचा दुरूपयोग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी बेमुदत आमरण उपोषण

पोलीस निरीक्षकाची दबंगशाही…??पदाचा दुरूपयोग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी बेमुदत आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .