• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 9, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

     महात्मा जोतीराव फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवक हे रुग्ण,रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालय यांच्यामधील दुवा म्हणून काम पाहत असतात.आरोग्य मित्रांचा संपर्क हा प्रथमदर्शी रुग्णांशी,रुग्णांच्या नातेवाईकांशी येतो.म्हणून कोरोना कोविड 19 चा संसर्ग होण्याची शक्यता असते.अनेक आरोग्यसेवक व आरोग्यसेवकांचे अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आल्याने आरोग्यसेवकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही आरोग्यमित्रांकरवीच होते.आरोग्यमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात आरोग्यमित्रांवर त्यांचे संपूर्ण कुटुंब आधारित असते आणि अशा आरोग्यमित्रांना तुटपुंज्या पगारावर कंत्राटी पद्धतीने विमा कंपनीने कामावर ठेवले आहे.अगदी एखाद्या बैलाला ज्याप्रमाणे शेतात राबवून काम करून घेतले जाते त्याचप्रमाणे आरोग्यमित्रांना राबवून घेतले जात आहे.आरोग्य मित्रांचा मासिक पगार किमान 25 हजार रुपये इतका करावा.

आरोग्य मित्रांची संख्या कमी असल्याने अंगीकृत रुग्णालयांमध्ये 24 तास आरोग्यमित्रांची नियुक्ती नसते त्यामुळे संध्याकाळी व रात्री एखादा पात्र रुग्ण योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आल्यास योजनेची माहिती देण्यासाठी,रजिस्ट्रेशन करण्यासाठी आरोग्यमित्र नसल्याने अंगीकृत रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात.अतिरिक्त पैशाची मागणी करतात.बेड शिल्लक नाही असे म्हणतात. अशा कठीण प्रसंगात रात्रीच्या वेळी आरोग्यमित्र नसल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत होत नाही प्रसंगी रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागतात.ही बाब अतिशय गंभीर असून विमा कंपनी व शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.प्रत्येक आरोग्यमित्र यांचा 50 लाख रुपयांचा विमा काढावा.आरोग्य मित्रांसोबत भेदभाव करू नये सरकार व विमा कंपनी मिळून आरोग्यमित्र यांचा छळ करीत आहेत.आरोग्य मित्र सुद्धा आरोग्यविभागाचा फ्रंटलाईन कर्मचारी आहे.विमा कंपनीच्या नियमांप्रमाणे आरोग्य सेवकांची कर्तव्य व शैक्षणिक पात्रता नमुद आहेत.एवढ्या शैक्षणिक पात्रतेच्या कर्मचाऱ्यास तुटपुंज्या पगारावर स्वतःचे कुटुंबाची उपजीविका तरी भागवता येईल का?राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना ज्या सोयी सुविधा आहेत त्या सर्व सोयी सुविधा आरोग्य सेवकांना लागू कराव्यात.त्यामुळे महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचा मासिक पगार 25 हजार रुपये करून प्रत्येक आरोग्यसेवकाचा 50 लाख रुपये विमा काढून अंगीकृत रुग्णालयांमध्ये 24 तास आरोग्यसेवकांची नियुक्ती करावी.यासाठी आरोग्य सेवकांच्या रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना तसेच प्रधान सचिव आरोग्य विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनदायी आरोग्य हमी सोसायटी यांना निवेदने दिली आहेत.कार्यवाही न झाल्यास 15 आगस्ट 2021 रोजी महात्मा फुले जनआरोग्य योजना जीवनदायी भवन वरळी यांच्या कार्यालयापुढे जनआंदोलन केले जाईल व होणाऱ्या नुकसानिस विमा कंपनी जबाबदार राहील असे निवेदनात म्हंटले आहे.

Tags: #आरोग्य भरती#आरोग्य सेवा#विमा

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
गुन्हेगारीपुणे हादरलं! महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये सापडले छुपे कॅमेरे??

गुन्हेगारीपुणे हादरलं! महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये सापडले छुपे कॅमेरे??

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .