• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Tuesday, June 24, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home मनोरंजन

मानसिक आजार आणि निराशेला नाहीसे करणाऱ्या विचार सुत्रांचा अंगिकार करावा.. अर्चना उके यांनी व्यक्त केले विचार

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 4, 2021
in मनोरंजन, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
मानसिक आजार आणि निराशेला नाहीसे करणाऱ्या विचार सुत्रांचा अंगिकार करावा.. अर्चना उके यांनी व्यक्त केले विचार

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 4 जुलै 2021

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनात आणि कृती आराखडा तयार करून सतत पॉझीटीव्ह विचार जोपासने महत्त्वाचे आहे. भूपृष्ठावर कितीही वाईट घडो, तरीही नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, प्रत्येक अपयश हे यशस्वी होण्यासाठी संधी देऊन जात असते. . जेव्हा …लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, आनंदी मनाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण जे करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी MPSC, UPSC, IAS,PSI , BANKING, DOCTOR, ENGINEERING , ARMY, NAVY , TEACHER , IPS , LAW, SCIENTISTS , असेल. भटकंती हेच पॅशन असेल.
त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.
सचिन-क्रिकेट,धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,
ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!…. महिन्याला दोन पुस्तके आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं जाऊ शकते.
अनेक चांगल्या आणि शैक्षणिक सामाजिक ,कथानक आणि कायदेविषयक पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.
महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढल्यास आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे. तर जे ..जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे. दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध केले की जगण्याची रंगत आणि सुधारणा वाढत जाते.
मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी डायर्‍यांनी खुप मदत होते. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली की , आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवावी , कधी छोट्या मोठ्या कारणाने मी खचलो नाही. पुस्तके वाचुनच प्रचंड बळ आणि आत्मविश्वास मिळतो. जे चांगले कार्य म्हणून सुरु केलंय त्याचा शेवट करण्याचा प्रयत्न करावा.हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं! हे मनात ठामपणे ठरविले पाहिजे.
मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा असतो. काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!
‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे.
. नवी आव्हाने स्वीकारा .जे करण्याची भिती वाटते? कमीत कमी तीस मिनीट व्यायाम करुन मनाला , शरिराला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडले की , मन आपोआप चांगले होते. जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे. ध्यान, सर्व समस्यांवर उत्तम उपाय असतो. शारीरीक व्यंग हे आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की करून पाहावा. महिन्याला एक वाईट सवय सोडण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करावा . प्रत्येकामध्ये एक ना एक वाईट सवयी असतात, एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगण्यासाठी आत्मविश्वासही बाळगता आला पाहिजे.महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करता आली पाहिजे. तरच यशस्वी होऊ शकतो.
प्रत्येक व्यक्तीने आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकाव करावा
एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावे ! कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे. जे ..चांगले विचार मिळाले त्याबद्द्ल कृतज्ञ रहावे .यशस्वी लोकांसोबत मैत्री करावी. ज्यांनी जगातील अनेक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात नमूद केलेल्या विचारांचा अधिकाधिक अभ्यास करून चांगले विचार आत्मसात करून घ्यावी. त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात. यश ही उत्साहा सारखं संसर्गजन्य असते. सुरक्षित अंतर ठेवा – जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे, निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये. तीस दिवसांचा प्लान करून तसे नियोजित कार्य करावे.- पुढच्या तीस दिवसात आपण काय करणार आहेत ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याच अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावे..!

Tags: #मानसिक तणाव#मानसिक ताणपुणेमानसिक आजारमुंबई

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
रुग्ण हक्क परिषदेचे “आरएचपी हॉस्पिटल”चे १५ जुलै रोजी होणार उद्घाटन!

रुग्ण हक्क परिषदेचे "आरएचपी हॉस्पिटल"चे १५ जुलै रोजी होणार उद्घाटन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .