- विजय यांनी व्यक्त केले विचार.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 29 जुन 2021:-
पत्रकारिता वर लिखाण करणे म्हणजे समुद्र मंथन करण्यासारखे आहे .ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिखाण करतांना अनेक इतिहासकार थकलेत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेली घटना समजतांना आयुष्य निघून जाते पण कित्येकांना समजून घेता आली नाही. त्याप्रमाणे पत्रकारितेवर अनेक थोरा-मोठ्यांनी लेखणी झिजवली. गहन विषयवर अजिबात लिखाण करणार नाही.मात्र,पत्रकारिता करतांना येणारे अनुभव,मज्जा,भीती, थरार हा या क्षेत्रात काम करतांना अनुभव येतो.मुंबई सोडल्यावर आम्ही 2014 ला गावी स्वतःच वृत्तपत्र सुरू केले.साप्ताहिक विजयनामा त्यावेळी माझे वडील बंधू,गुरू,मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार हेमंत जोशी ह्यांचे शब्द न शब्द आठवतात.गावी पत्रकारिता करणे म्हणजे सर्कस मधील तारेवरील कसरत आहे.गावात थोड्याच काळात तुझे संबंध रुळतील, मैत्री होतील.तेव्हा पत्रकारिता करणे महाकठीण होईल.त्याचा अनुभव आम्हाला येथे येत आहे.एक मोठी गंमत येथे सांगने गरजेची आहे. कोणत्याही पत्रकाराने उत्तम लिखाण केले,सत्य जगासमोर मांडले की त्याचे समर्थक व विरोधक आपोआप निर्माण होतात.मुख्यतः समर्थक हे काळ निहाय राहतात.परंतु,विरोधक एकत्रित होत असतात.ह्याची पूर्णतः कल्पना होती आणि आहे. पत्रकारांना असावी.आम्ही जेव्हा जेव्हा जगासमोर काही मूजो..र महाभागांना नग्न केले त्यावेळी अनेकांनी आमच्या पाठीवर हात ठेवला.मात्र,आम्ही पत्रकारिता करतांना समाज दिशादर्शनासाठी करतो हेच काही लोकांना कळत नाही. दुसऱ्याच ते कार्ट आपला तो बाब्या. या म्हणी नुसार लोकांच्या गोष्टी बाहेर काढल्या की पोटात गुदगुदी होणारे जेव्हा त्यांच्या गोष्टी समाजासमोर मांडण्याची वेळ येते,तेव्हा गुंडगिरी अंगात आणणारी जमात आम्ही बघत आहोत. मागील काळात आम्हाला पोलीस स्वरक्षण मिळावे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यकारिणीने व अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकारिणीने निवेदन सादर केले होते.त्यावेळी जळगाव जामोद येथील शवविच्छेदन गृहाची चोरी हा विषय लावून धरला होता. त्यातील आरोपी व प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे महिला मागे लावून आरोपी करण्याचा डाव होता ,ट्रॅक खाली चिरडून टाकायचे मनसुबे शिजत होते,त्यामुळे साहजिकच आमच्यावर प्रेम करणारे घाबरले होते .पत्रकारिता हा अग्निपथ आहे हे आम्हाला ज्ञात आहे.आम्ही मरणाला अजिबात भीत नाही, बदनामीची परिसीमा आम्ही आधीच गाठलेली आहे.त्यामुळे अनेक भिकारी पोटभरू मुजो..र दलाल भडवे आमच्या बदनामी करण्यात रोशन झाले.मात्र, जेथे होतो त्यापेक्षा उंच झालो. पत्रकारिता करतांना एक नवीन अनुभव आला लोक जातीवरून सुद्धा शिव्या द्यायला लागले.असो.!
जेव्हा शिक्षित माणसं मारामारीवर येतात तेव्हा समजायचे असते की ह्याची बौद्धिक पातळी घसरली आहे. खानदानी, घरंदाज सुशिक्षीत लोक कधीच हातापाई, मारामारी करीत नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून ठेवले आहे, त्याचा विचार-अभ्यास केल्यास येथे पेनाची लढाई ही सत्य मार्ग आहे. चक्रीवादळा सारख्या पत्रकारांना बदनाम करणाऱ्या काही गोष्टी गडचिरोली सारख्या शहरात आणि ग्रामीण भागातील मुजो..र लोकांमध्ये आहेत. महानगर व शहरी भागाला लागू होऊ शकत नाहीत असेही नाही. .येथे गमती जमाती छान असतात. बातमी मध्ये नाव वर खाली झाले तरी लोक नाराज होतात, फोटो लावला नाही म्हणून नाराज होतात.प्रसिद्ध करावे हा ठेका बिन पगारी वार्ताहर- पत्रकारांनी घ्यावा.ही मानसिकता असते .मात्र, जेव्हा हा वार्ताहर- पत्रकार 15%कमिशन साठी जाहिराती जमा करतो. तेव्हा हीच मंडळी तोंड लपवत फिरते. जाहिरात दिली तरी 100 चकरा त्या पत्रकाराला भाई, बाई, दादा, साहेब ह्यांच्या मागे माराव्या लागतात. .कित्येक स्वतःला पांढरपेशी म्हणून घेणारी लोक पत्रकारांच्या जाहिरातीचे बिल वर्षभर देत नाहीत. कधी तरी यादीच प्रसिद्ध करेल.त्यामुळे त्याला सत्य मांडतांना जाहिरात पार्टी हे मोठं संकट आडवं येत.त्यामुळे समजमाध्यम हा उत्तम पर्याय उरला आहे.असो.!
पत्रकरिता करतांना अनेकांचे जीव गेले .पत्रकरिता करतांना अनेक पैलू समाजा समोर ठेवले. इतिहास असो वा शोध पत्रकरिता, सामाजिक विषय असो वा राजकीय .,नगरा पासून थेट दिल्ली राजकारणावर स्पष्ट बोलतो. सर्वपक्षीय चुका आम्ही मांडतो. मुजो..र दलाल भडवे, पोटभरू मनुवादी विचार सरणी देशाला घातक आहे म्हणून त्यांच्या चड्डया ज्यास्तच उतरवतो हा भाग वेगळा. पत्रकरिता करतांना सामाजिक, न्यायीक लढा उभारत राहतो, जे सर्वच पत्रकार लेखणीच्या माध्यमातून करतात . रस्त्यावर उतरून सुद्धा करतो. आदिवासी लोकांचा वनजमीन लढा असो वा पीकविमा शेतकरी लढा आम्ही मागे हटत नाही.अनेक लहान मोठ्या समस्या वर तुटून पडतो.तरी सुद्धा अनेक महाभाग, दलाली करून पोट भरणारे भडवे शिव्या घालत असतात ते त्यांचे संस्कार दाखवीत प्रदर्शन मांडतात त्यामुळे आम्ही तिकडे अजिबात लक्ष देत नाही.
.इमानदार, नौकारशाह कडून पैसे सज्जनाला कधीच कोणताच पत्रकार त्रास देत नाही. त्रास या शब्दाचा वापर करणे सुद्धा चूक होईल.तो गोरगरीब लोकांच्या साठी लेखणी झिजवतो.भ्रष्ट्राचार करणारे,सरकारी जमीन हडपणारे, ब्लॅकमेल करून अवैध मार्गाने मुजो..री धंदे. करणाऱ्या नालायक लोकांना तो खुलेआम समाजात नग्न करतो. तो त्रास नाही. तेव्हा मात्र,काही स्वतःच त्या पत्रकाराला लाच देण्याचा प्रकार करतात व जेव्हा तो ऐकत नाही.किंवा त्याला भिकऱ्या सारखे देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा वाद होतात .मग,पत्रकारांना मारहाण करणे, खंडणीची खोटे गुन्हे दाखल करणे हे प्रकार होतात. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे सर ह्याना तर अनेकदा मारहाण सुद्धा झाली. राष्ट्रीय पातळीवर पत्रकारिता करणारे विनोद दुवा ह्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला.असे अनेक प्रकार पत्रकरिता करतांना समोर येतात. कॅबिन मध्ये बोलावून मारण्याची धमकी देण्यात आली.पण,आम्ही मात्र, कफन बांध के घर से निकलते. या प्रकारातील पत्रकार आहे. पोटभरू दलाली करून जिवन जगणाऱ्या भडव्या मुजोरांचे चालेंज स्वीकारणे आत्मसाथ केले आहे.आता शेंडी तुटो वा पारमबी. लढाई मरणाच्या पुढे जाऊ शकत नाही. विधानसभा निवडणूक काळात प्रतिष्ठान जळण्या पर्यंत विषय गेला होता. मात्र डगमागलो नाही.भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ह्याचा विचार केला तर पत्रकारिता करूच शकत नाही.त्यामुळे ज्यांना माझ्या सारख्या खुलेआम लिहिणाऱ्यांना संपवायचे असेल तर त्यांनी दम असेल तर समोरा..समोर येवून खुलेआम संपवावे. त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र,पत्रकार हा कधीच मरत नसतो.एक गौरी लंकेश मारली तर हजारो तयार होतात. पाप हे लपणार नाही. पत्रकार मित्रांनो! स्वतःचे व्यवसाय सुरू करा.जाहिरातीच्या माध्यमातून घर चालणार नाही.शेतकरी वर्गाला जसा जोडधंदा शिकविला जातो तसे जोडव्यावसाय करा .पत्रकारिता उरून पुरेल. जीवन आम्ही समर्पित केले आहे .बघूया !! आमच्या मुजो..र मित्राला आमचा जीव कधी घेता येतो, की आम्ही भानगडी उजागर करतो. हे काळच सांगेल. ( वि वि स पो)