“ कोरोना लॉक डाउन मधील दुर्गम भागातील एक हजार आदिवासी – कातकरी कुटूंबाना अन्न धान्य किट सेवा कार्य :-
गत चाळीस वर्षे पेक्ष्या अधिक अविरत दुर्गम अश्या कोयना खोऱ्यात व रायगड कोकण अश्या दुर्गम भागात सेवा कार्य करणाऱ्या मा, बाळासाहेब कोळेकर उर्फ आण्णा संस्थापक असलेल्या श्रम जीवी जनता सहायक मंडळ राम मळा – पाटण ( सातारा ) संस्थेच्या वतीने मा, राम कोळेकर यांच्या मार्गदर्शन खाली जावळी, धोम, तारळे, कोयना, कण्हेर, कृष्णा, खोरे, व धरण परिसरात दुर्गम भागात उपजीविका करून संघर्ष मय जीवन जगणाऱ्या दुर्लक्षित अश्या सुमारे एक हजार गरजू आदिवासी कुटूंबाना उपजीविका किट अन्न धान्य असे किमान पंधरा ते एक महिना पुरेल असे किट चे वाटप कर्तव्य भावनेने करण्यात आले.
सदर आदिवासी कातकरी कुटूंबाना शोधून मदती साठी श्रमिक संस्था चे संस्थापक श्री आदिनाथ ओंबळे, श्रमिजीवी संस्था चे कार्यकर्ते टीम मधील श्री दत्तात्रय कुंभार, श्री प्रताप गोरे, लहू तरडे, आदिवासी कातकरी कार्यकर्ते हौश्या मुकणे, आदिवासी कातकरी नगर सेवक नानू जाधव व टीम ने सदर सेवा कार्य कामी विशेष अहो रात्र भर पावसात सदर मदत व सेवा सहयोग एक मिशन म्हणून कार्य केलें.सदर मदत मेनवली, रामेश्वर वाडी, तारळे आदिवासी वस्ती, मामूरडी, कण्हेर धरण, धोम धरण, कृष्णा काट, कोयना काट, तारळी काट नदी व धरण परिसरातील सुमारे चाळीस पेक्ष्या अधिक आदिवासी कातकरी पाड्यात करण्यात आली. मा, बाळासाहेब कोळेकर उर्फ आण्णा यांनी श्रम जीवी संस्था 1972 च्या दरम्यान कोयना धरण, कोयना खोऱ्यातील दुर्गम भागातील आदिवासी व गरजू अश्या कुटूंबाना उपजीविका निर्मिती करणे व आधार देणे साठी सुरु केली होती. सदर सेवा माध्यमातून दुष्काळ भागातील सेवा सहयोग, रायगड कोकण मधील आदिवासी साठी उपजीविका, कृषी नावीन्य पूर्ण उपक्रम, पूर, भूकंप, अश्या विविध आपत कालीन मध्ये भरीव मदत गत चाळीस वर्ष पेक्ष्या अधिक काळ अविरत पणे सेवा सुरु आहे. राम मळा – पाटण येथे गरजु गरीब विदयार्थी साठी कृषी विद्यालय, बांबू कला कौशल्य निर्मिती, सेंद्रिय शेती, डोंगरी भागातील निसर्ग निर्मित पाण्याचे झरे पुनर्जीवन, सेंद्रिय शेती, पशु पालन, अश्या विविध सेवा सहयोग असून जल, जंगल, जमीन या मधून उपजीविका समाज निर्मिती कार्य सुरु असून सदर सेवा कार्य साठी मा बाळासाहेब कोळेकर उर्फ आण्णा यांचे मार्गदर्शन खाली सदर सेवा साठी मा राम कोळेकर व टीम अविरत कार्य करत असून सदर सेवा साठी राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय असे अनेक पुरस्कार ने श्रम जीवी संस्था च्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.