रतन टाटा यांना कोण ओळखत नाही आज धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीस यशाच्या पाठी धावावे लागते परंतु ते करण्यासाठी फारच कमी लोक त्या वाटेवर चालतात. जर तुम्ही आपला व्यवसाय सुरु करत असाल अथवा आधीपासून व्यवसायात असाल.आणि तुम्हास प्रगतीचा मार्ग सापडत नसेल तर टाटांच्या यशाचा कानमंत्र तुम्हाला मोलाचा ठरणार आहे.
टाटा सन्स यांच्या कंपनीची उलाढाल ही हजारो कोटीच्या घरात असून त्यांची व्यवसाय क्षेत्रावर मजबूत पकड आहे .फायद्या तोट्याच्या घोडदौड मध्ये काय आहे मूलमंत्र ते आपण जाणून घेऊ
🎯 मूल्यांवर फोकस हवा🎯
टाटा ग्रुपविषयी बोलायचं झालं तर या ग्रुपची व्हॅल्यू म्हणजेच मूल्य जास्त आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. अशा परिस्थितीत रतन टाटा आशा करतात की स्टार्टअप्सनेही व्हॅल्यू फॅक्टरला महत्व दिले पाहिजे. आणि आपल्या मूल्यावर फोकस केला पाहिजे.व्यवसायात मूल्य महत्वाची असतात.
🎯 (इनोव्हेशनवर) नवनवीन गोष्टीवर भर असावा🎯
रतन टाटा यांचा असा विश्वास आहे की नव नवीन प्रयोग करत राहणे महत्वाचे आहे. त्या मध्ये स्टार्टअपचं भविष्य उज्वल असतं. त्यामुळे इनोव्हेशन आयडिया करीत राहिलं पाहिजे. टाटा स्वतः स्टार्टअपसाठी इनोव्हेशन जास्त भर देत असतात.उद्योगाचा हाच धागा ते पकडत असतात
🎯 कामाला प्राधान्य दिले पाहिजे🎯
उद्योगासोबतच राजकारण अथवा इतर बाबतीत रस घ्यायला सुरुवात केल्याचे भारतातील अनेक औद्योगिक घराण्यांबाबत शिथिलता आलेली पाहायला मिळत आहे. टाटा ग्रुप आणि विशेष करुन रतन टाटा या सर्वापासून दूर राहिले आहेत. ते आपल्या जीवनात काम हेच सर्वकाही आहे असे मानतात आणि कामाला प्राधान्य देतात. त्यांचा त्यांच्या कामावर फोकस असतो.
🎯दुसऱ्यांचा सन्मान केला पाहिजे 🎯
ज्यांनी रतन टाटा वैयक्तिकरित्या कसे आहेत ते माहिती आहे ते सांगतात की रतन टाटा नेहमी शांत व सौम्य असेच आहेत. कंपनीतील छोट्यात छोट्या कर्मचाऱ्यांची प्रेमाने भेट घेतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात.सन्मानजनक वागणूक ते नेहमी देतात.
🎯दृष्टीकोन सकारात्मक असावा लागतो🎯
टाटा यांच्या म्हणण्यानुसार उद्योगाच्या प्रवर्तक चा दृष्टीकोन कसा आहे ते कोणत्या आयडिया घेऊन आले आहेत आणि त्याचे निराकरण करण्यासाठी ते कोणत्या विचारांच्या आधारे कार्य करतात, हे फार महत्वाचे आहे.टाटांच्या मते नवीन कंपनी नवीन आयडिया नवीन गुंतवणूक याबाबत सकरात्मक असले पाहिजे.
🎯कोणतीच वेळ योग्य अथवा अयोग्य हे महत्वाचे नसते
ऑक्टोबर 2019मध्ये एका मुलाखतीत रतन टाटा यांनी सांगितलं होतं की स्टार्टअपसाठी ग्लोबल (Global) होण्याकरिता योग्य वेळ वैगरे असं काही नसतं.
कारण कचरा वेचणाऱ्यांसह काम करुन कचऱ्यापासून बनवल्या हँडबॅग त्याचा व्यवसाय आज आहे 100 कोटींचा टर्नओवर च्या वर आहे
जागतिक विस्तार कधी करायचा याची जबाबदारी आणि समजूतदार हा त्या संस्थापकाचा असतो. मी हे देखील पाहतो की प्रमोटर किती मॅच्युअर आहेत आणि नव्या कंपनीबाबत ते किती गंभीर आहेत, असे टाटा यांनी सांगितले.
या आयडिया व आपल्या उद्योगास नक्कीच उभारी देतील त्यामुळे यशाच्या मूलमंत्रास वेळ काळ महत्वाचा नसतो.