मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 10 जुन 2021:-
कोरोना महामारीपासून सर्वसामान्य जनतेला वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. सरकारकडून धार्मिक उत्सव यात्रा व जत्रा यांच्यावर सध्यातरी बंदी घातलेली आहे. त्याच धर्तीवर सरकारने पंढरपूर येथे आषाढी यात्रेतील गर्दी कमी करण्यासाठी यात्रेवर बंदी घातली आहे. आषाढी वारीच्या बंदीवर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे.
भाजपने वारकऱ्यांच्या पायी आषाढी वारीला सरकारने परवानगी द्यावी असा आग्रह धरला आहे. त्या वरून सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजप यांच्यात जोरात शाब्दिक आरोप-प्रत्यारोप सुरू होते. भाजपने महाविकास आघाडीवर आरोप करत असताना राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोघलांचे सरकार कार्यरत आहे. त्यामुळे अनलॉकच्या काळात इतर सर्व बाबींना परवानगी देण्यात आली आहे.
मात्र फक्त हिंदूंची मंदिरे बंद ठेवण्यात येत आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांना ही परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये हिंदू मंदिरांचा समावेश करावा व पंढरपूरची वारी पायी चाल वारकऱ्यांना परवाना मिळायला पाहिजे. यासंदर्भात कोणता ही तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही, असा भाजपने इशारा दिला आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते, सचिन सावंत यांनी आरोप केला आहे की, भाजपच्या अधर्माचा अध्यात्माशी काही ही संबंध नाही.
तसेच राजकारण व अध्यात्म हे वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे भाजपची अध्यात्मिक आघाडी या थोटांडातून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भोंगाळवद स्थापित करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांच्यावर ही त्यांनी हल्लाबोल केला आहे. सावंत यांनी भोसले यांना अनाचार्य असे संबोधले आहे. त्यामुळे अनाचार्य याच्या भाषेत राजकारणाचा अध्यात्माशी कसला ही संबंध नाही.
धर्माच्या राजकारणासाठी चालू असणार थोतांड बंद करा, असं जाहीर आव्हान ही सचिन सावंत यांनी केले आहे. पाठीमागच्या वर्षी ही महाराष्ट्रातली मंदिरे उघडण्यासाठी भाजपने आंदोलने केले होती. पण सरकारने सावध भूमिका घेऊन त्यांच्या मागणीला विरोध केला होता. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने राज्यभर घंटानाद आंदोलन केले होते. आता पुन्हा पंढरपूरच्या वारी वरून भाजपने मंदिर उघडण्याचा मुद्दा पुढे केला आहे.