• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Sunday, June 22, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home आर्थिक

थकीत कर्जाचे हप्ते आणि नागरिकांचे अधिकार; जागरूक असणे गरजेचे आहे. बँकांनी हे नियम पाळणे महत्वाचे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 10, 2021
in आर्थिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
थकीत कर्जाचे हप्ते आणि नागरिकांचे अधिकार; जागरूक असणे गरजेचे आहे. बँकांनी हे नियम पाळणे महत्वाचे

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10 जून 2021:-

अनेकजण आपल्या घरासाठी, वैद्यकीय कारणांसाठी किंवा कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात. परंतु, काहीवेळा प्रतिकूल परिस्थितीमुळे आपण हप्ते भरू शकत नाही. बँक किंवा रिकव्हरी एजंटकडून हप्ता भरण्यासाठी दबाव आणला जातो. यामुळे बरेच लोक घाबरतात किंवा डिप्रेशनचे शिकार होतात.
बँकांना देण्यात आलेल्या हक्कांबरोबरच तुम्हालाही काही हक्क मिळाले आहेत. जे बँकांना कोणतीही कारवाई करण्यास प्रतिबंधित करतात.
नागरिकांचे अधिकार? हे माहीत असणे आवश्यक आहे.
बँक आपल्याला धमकी देऊ शकत नाही किंवा आपले शारीरिक नुकसान करू शकत नाही. कर्ज फेडणे न झाल्यास गहान ठेवलेल्या मालमत्ता विक्रीसाठी 30 दिवस अगोदर सार्वजनिक नोटीस दिली जाते.
बँका कधीकधी तृतीय पक्षाच्या लोकांना वसुलीसाठी आपल्याकडे पाठवू शकतात मात्र हे लोक फक्त दिवसा आपल्याकडे येऊ शकतात आणि रात्री आपल्याकडे येऊ शकत नाहीत.
आपली मालमत्ता विकली जात असेल तर मार्केट रेटनुसारच विकली जाते व आपल्याला कर्ज व काही कर वजा करून उरलेली रक्कम मिळू शकते. कोणतीही बँक आपल्याशी सामाजिक आणि सार्वजनिक रित्या गैरवर्तन करू शकत नाही.
अधिकार माहिती असायला हवेत कर्ज नाकारण्याचा अधिकार जरी बँकेला असला, तरी कर्ज का नाकारले, याचे लेखी उत्तर ग्राहकाला देणे अनिवार्य आहे. बँकेमध्ये २० लाख किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करत असाल तर त्या अर्जाचे पुढे काय झाले याचे उत्तर ३० दिवसांच्या आत बँकेतून त्या ग्राहकाला येणे अपेक्षित असते. क्रेडीटकार्डचे बिल भरण्यासाठी काही अडचणी येत असतील, तर मुदतीआधी कॉल सेंटरला फोन करून याविषयी नोंद करा, आणि किती दिवस उशीर होणार आहे, ते सांगा. यामुळे तुम्हाला दंड लागणार नाही. चेक कलेक्शनमध्ये बँकेकडून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्यावर ग्राहकांना भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. भरपाईची रक्कम साधारण व्याज दराच्या हिशोबाने चुकवली जाईल. ग्राहकाने बँकमधून लोन घेतले आहे आणि त्यासाठी सिक्युरिटी दिली असेल, तर या प्रकरणामध्ये पूर्ण लोन फेडल्यानंतर १५ दिवसांच्या आतमध्ये सिक्युरिटी परत मिळाली पाहिजे. ग्राहकांची खाजगी माहिती गुप्त ठेवणे बँकेची प्रमुख जबाबदारी आहे. बँक तुमची खाजगी माहिती तुमच्या संमतीशिवाय कोणालाही सांगू शकत नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या हितासाठी हे अधिकार निश्चित केले आहेत.
बँकेत तुमच्या किंवा इतरांच्या बाबतीत या अधिकारांचे हनन होताना दिसून आले तर थेट वरिष्ठांकडे जा. सुलभ बँकिंग हा ग्राहकांचा हक्क आहे आणि हा हक्क पूर्ण करायला बँका बांधील असतात.

Tags: #finaceBankingEMIFInanceRBIThisनागरिकांचे अधिकार

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
महागाई विरोधात मोदींच्या कानात घंटा वाजवली तर रामदेव ला झुल्यात झुलवुन कॉग्रेसचे आंदोलन.?

महागाई विरोधात मोदींच्या कानात घंटा वाजवली तर रामदेव ला झुल्यात झुलवुन कॉग्रेसचे आंदोलन.?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .