• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

उस्मानाबादच्या रेड झोन ला जबाबदार कोण? राजकीय अनोदलनाला बंदी घाला-सुनील ढेपे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 7, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक
0
उस्मानाबादच्या रेड झोन ला जबाबदार कोण? राजकीय अनोदलनाला बंदी घाला-सुनील ढेपे

कोरोना …..
उस्मानाबादच्या रेड झोनला जबाबदार कोण ?
राजकीय पक्षाच्या आंदोलनाला बंदी घाला…
आंदोलनात फिजिकल डिस्टनचा अभाव.

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 7 जून 2021:-

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण लॉक असलेला उस्मानाबाद जिल्हा सोमवार दि. ७ जून पासून अंशतः अनलॉक होत आहे. सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सर्व दुकाने सुरु होणार आहेत. हॉटेल, बार देखील सुरु होणार आहेत. लालपरी म्हणजे एस.टी .ची चाके धावणार आहेत. आजवर लोक अडकून पडले होते आता मोठ्या संख्यने बाहेर पडतील. मात्र अनलॉक झाल्यानंतर पुन्हा लॉक करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी सर्वानी घेण्याची गरज आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ८९२ कोरोना रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५२ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२७२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १९०० झाली आहे.सर्वाधिक मृत्यू एप्रिल- मे महिन्यात झाले आहेत. दररोज २० च्या पुढे मृत्यूचा आकडा होता. त्यावेळी मृत्यूचे आकडे लपवण्यात आले. खऱ्या मृत्यूचा आकडा मोठा आहे. अनेक जिवाभावाची माणसे गेली. ज्याचा कर्ता माणूस गेला, त्याच्या घरी काय दुःख आहे, हे त्यालाच माहित. कोरोना झाल्यानंतर बरे होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कितीही पैसे मोजायला तयार असलेला माणूस ५० रुपयांचा चांगला मास्क आणि ५० रुपयाची सॅनिटायझर बाटली असे १०० रुपये खर्च करण्यासाठी मागे – पुढे पाहतो. सार्वजिनक ठिकाणी जाताना तोंडावर मास्क असलाच पाहिजे. खिशात सॅनिटायझरची छोटी बाटली ठेवलीच पाहिजे आणि सोशल डिस्टिंसिंग पाळलेच पाहिजे. कोरोनाची साखळी कायम तुटलीच पाहिजे.
कोरोनामुळे मागील वर्षी शाळा- महाविद्यालय सुरु होवू शकले नाहीत. त्यामुळे दहावी- बारावीची परीक्षा सुद्धा होवू शकलेली नाही. यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. घरात बसून विद्यार्थी देखील कंटाळले आहेत. शाळा कधी सुरु होतें, याची वाट ते पाहात आहेत. अनेक विद्यार्थांनी गेले वर्षभर हातात पुस्तकच धरलेले नाही. ऑनलाइन शिक्षण विद्यार्थाना पचनी पडत नाही. कोरोना नष्ट झाला तरच शाळा सुरु होतील.
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय ठप्प झाले आहेत. ज्यांचा व्यवसाय भाड्याच्या जागेत सुरु आहे, त्याचे भाडे चुकलेले नाही आणि व्यवसाय काहीच नाही. अनेकांना दुकाने कायमची बंद करावी लागली. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना काम नाही. एकंदरीत अर्थव्यवस्थेचा गाडा रुतून बसला आहे, तो सुरळीत केव्हा होणार,याचे उत्तर कुणाकडे नाही. आंदोलनाला बंदी घाला .
खरं तर कोरोना पसरवण्यात सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा मोठा वाटा आहे. राज्यातील विरोधी पक्ष राज्य सरकार विरुद्ध आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष केंद्र सरकारविरुद्ध कोरोना काळातही आंदोलन करताना पहावयास मिळाले. आता जरा कोरोना कमी झाला तर आंदोलनाची तयारी सुरु आहे. बरं , या आंदोलनामुळे सत्ताधारी पक्षावर काडीचाही परिणाम होत नाही. आंदोलनात सोशल डिस्टिंसिंगचा फज्जा उडालेला असतो. यामुळे यांना कोरोना घेरतो आणि त्यांच्यामुळे इतरांना घेरतो.सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याची खुर्चीसाठी चालू असलेली लढाई जनतेच्या मुळावर उठू नये. त्यासाठी आंदोलनाला एक वर्षे तरी बंदी घाला. उस्मानाबाद जिल्हा अजूनही रेड झोन मध्ये आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी दर ७.७० आहे. जिल्हा ग्रीन झोन मध्ये येण्यासाठी प्रत्येकाला जबाबदाराचे भान हवे. बेभान होणाऱ्याला कायद्याचा बडगा दाखवायला हवा. तरच आपला उस्मानाबाद जिल्हा ‘ब्रेक द चेन’ होईल. असे स्पष्ट मत सुनील ढेपे
( उस्मानाबाद लाइव्ह ) यांनी व्यक्त केले आहे.

Tags: Islamabadउस्मानाबादग्रामीण उस्मानाबादचंद्रपूरपुणे

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
मंगळ ग्रहावरील जग तुम्ही बघितले आहे का? पहा!

मंगळ ग्रहावरील जग तुम्ही बघितले आहे का? पहा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .