जनविद्रोही प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची यला मिळाली. पण आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. देशातील मृत्यूच्या संख्येत देखील चढउतार होत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती आणखीन नियंत्रणात आणण्यासाठी कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. तसेच यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
केंद्राने राज्य सरकारला सांगितले आहे की, ‘ज्या जिल्ह्यात अधिक कोरोनाबाधित आहेत, त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयायोजना सूनिश्चित करा. कठोरपणे निर्बंध लागू केल्यामुळे दक्षिण आणि ईशान्यच्या काही भागांना सोडून संपूर्ण भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे.’