*माळशिरस तालुक्याला किमान दररोज 5,000 कोवीड लस व ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याची पंचायत समिती सदस्यांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी*
माळशिरस
माळशिरस तालुक्याला किमान दररोज 5,000 कोवीड लस व रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची पंचायत समिती सदस्य अजय सकट ,माउली पाटील, गौतम माने व रमेश पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे मागणी केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार आर जी रूपनवर,माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबराजे देशमुख, मामासाहेब पांढरे,प्रांताधिकारी शमा पवार,तहसीलदार जगदीश निंबाळकर,गटविकास अधिकारी स्मिता पाटील,नातेपुतेचे सरपंच कांचन लांडगे,उपसरपंच अतुल पाटील,विष्णुपंत नारनवर,सरपंच अमित वाघमोडे, सरपंच पोपट सरगर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ,कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड लसीची गरज असून तालुक्यात लसीकरण झाल्यास हा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे तालुक्याची लोकसंख्या साडेपाच लाख असून सध्या अत्यल्प प्रमाणात लस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी व गोंधळ होत आहे आणि अपुर्या पुरवठ्यामुळे लोक लसीशिवाय माघारी जात आहेत.
आम्ही मागणी केल्याप्रमाणे लस आता गावामध्ये किंवा उपकेंद्रामध्ये उपलब्ध होणार असल्यामुळे लोकसंख्येचा विचार करता तालुक्याला दररोज किमान 5,000 लस आवश्यक आहेत. त्यामध्ये 12 पी.एच.सी., 3 ग्रामीण रुग्णालय, 76 उपकेंद्रे व माळशिरस नगरपालिकेतील काही ठिकाणे या ठिकाणी लसीकरणासाठी स्थळ म्हणून निश्चित करण्यात आलेले आहे. सध्या 45 वर्षापुढील दुसरा डोस हा टप्पा चालू असल्याने अनेकांचा दुसरा डोस अद्यापही राहिला असल्याने तो ही पुर्ण करणे आवश्यक आहे. तसेच 1 मे पासून अठरा वर्षापुढील सर्वांना लसीकरण शासनाने जाहीर केल्यामुळे एकंदरीत लसीकरणाचे प्रमाण वाढले असून लसी खूपच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे दररोज किमान पाच हजार लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. यावी तरच तालुक्यात कोवीड चा संसर्ग कमी होईल तरी आपण योग्य ती कार्यवाही करावी.
तसेच अकलूज हा मेडीकल हब असल्यामुळे आजूबाजूच्या गावांतील, तालुक्यातील अनेक पेशंट अकलूजमधील शासकीय किंवा खाजगी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होत आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेला ऑक्सीजनचा साठा खूपच कमी पडत आहे. त्यामुळे तालुक्याचा विचार करता जास्तीत जास्त ऑक्सीजनचा साठा तालुक्याला उपलब्ध करुन देण्यात यावा