• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

बहुजन समाजाला बुध्दीहीन करण्याच्या प्रयत्ना विरोधात तरुणांनी लढा उभारावा. :- संपतराव पवार यांचे आवाहन

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 10, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा
0
बहुजन समाजाला बुध्दीहीन करण्याच्या प्रयत्ना विरोधात तरुणांनी लढा उभारावा. :-  संपतराव पवार यांचे  आवाहन

मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम.दि. ९ मे. २०२१ :-

सध्या बहुजन समाज एका मोठ्या कात्रीत अडकलेला आहे.बहुजन समाज हा बुध्दीहीन करण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे.शैक्षणिक धोरण आणि अवलंबलेल्या तंत्रामुळे सध्याचे वातावरण आता जातीवाचक नव्हे तर बुध्दीहीन विरुद्ध बुध्दीवान असा करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने आवाज उठवावा, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते भाई संपतराव पवार यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षातर्फे शेकाप युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबीर अंतर्गत आयोजित शेकाप मध्यवर्ती समीतीचे सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत त्यांनी पुरोगामी युवक संघटना किल,आज आणि उद्या या विषयावर युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जलनायक,पाणी चळवळीचे नेते भाई संपतराव पवार म्हणाले,सध्याचा काळ पाहता, आजूबाजूची परिस्थिती विषण्ण करणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती ही समाजामध्ये निर्माण करण्याची या कोरोना कालखंडात तीव्र गरज आहे.अडचणीत सापडलेल्या, संकटात अडकलेल्या माणसाला मदत करणं आणि एक पुरोगामी, कष्टकरी विचारांचा आवाज बुलंद करुन प्रश्न मार्गी लावणं यासाठी युवकांची फ्रंट बलशाली करण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा हा उपक्रम स्वागतार्ह असल्याचे भाई संपतराव पवार म्हणाले.

शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेनंतरचा इतिहास विशद करताना भाई संपतराव पवार म्हणाले,१९६५ मध्ये संघटना स्थापन झाल्यानंतर पक्षाच्या विचारांवर, राज्यातील सत्ताधारींना सळो की पळो करुन सोडले.सीमाप्रश्न, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे, फी माफी तसेच १९७२ च्या दुष्काळी परिस्थिती या विषयी पुरोगामी विद्यार्थी संघटनेमार्फत आवाज उठवून सरकारला दखल घेण्यास बाध्य केले,प्रसंगी कार्यकर्ते जेलमध्येही गेलोत.याच चळवळीतून पुढे सक्रीय राहून लढा सुरू ठेवल्याने सरकारला समान पाणी वाटप, चारा छावण्या सुरु करण्यासारखे धोरण सरकारला स्विकारावे लागल्याचे भाई संपतराव पवार यांनी सांगितले.

संघटनेला कार्यक्रम न देणे हे संघटना मारण्यासाठी संपविण्यासाठी कारणीभूत आहे.आता नव्या कालखंडात, नव्या वातावरणात नवे तंत्र,नवे मार्ग काढून संगठना बांधणी करीता गेलो पाहिजे.गरजेतून निर्माण झालेली संघटना कधीच संपत नाहीत.त्यासाठी लोकांच्या गरजेवर लढण्याची आवश्यकता असल्याचे मतही भाई संपतराव पवार यांनी मांडले.

*व्याख्यानमालेला राज्यभरात उदंड प्रतिसाद*

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या युवा नेत्या चित्रलेखा पाटील आणि साम्य कोरडे यांच्या पुढाकाराने शेकाप युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबीर अंतर्गत आयोजित या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेला संपूर्ण राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन झालेल्या थेट प्रक्षेपणाचा हजारो युवक कार्यकर्त्यांनी लाभ घेतला.या व्याख्यानमालेमुळे शेकापच्या विद्यार्थी आणि युवक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

Tags: Latest speechMumbaiPuneव्याख्यानमाला

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
प्रत्येक शब्द ‘प’ पासून सुरु करुन लिहिला परिच्छेद?

प्रत्येक शब्द 'प' पासून सुरु करुन लिहिला परिच्छेद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .