केबिनमध्ये बसून फक्त आकडेवारी गोळा करण्यात थुंद असणाऱ्या…..
आटपाडी येथील निष्क्रिय तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी…..
मा. राजेंद्र खरात. अध्यक्ष, आर. पी आय. ( A)
सांगली जिल्हा प्रतिनिधी:- प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे.
आटपाडी.दि.२६. आख्खा महाराष्ट्र कोरोनाशी युद्ध खेळत असताना या युद्धात सामान्य माणूस कोरोनाच्या विषाणू संसर्गावर मात करून तो या कोरूना च्या युद्धामध्ये जिंकावा. यासाठी महाराष्ट्र शासन विशेषतः आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्नांची निखरीची झुंज देत असताना कोरोना योथ्दे असणारे अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आपले जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील रोजची कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या चिंताजनक पणे वाढत असतानाच आटपाडी सह आटपाडी तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या आटपाडी तालुक्याची भयावह स्थिती दाखवणारी आहे .त्यामुळे आटपाडी मधील वाढणारी रोजची रुग्ण संख्या ही सांगली जिल्ह्याच्या चिंतेत अधिकच भर घालणारी अशी आहे.
अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑफिसच्या बाहेर पडून सामान्य माणसाला आधार देणे , कोरोणा विषाणू संसर्गा च्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करणे, रुग्णांच्या सोयीसाठी योग्य नियोजन करणे, आणि ही संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी त्यासाठी विशेष प्रयत्न करणे, बेडची संख्या वाढवणे, उपचार करणाऱ्या नर्सची संख्या वाढवणे, हे तालुका वैद्यकीय धिकार्याचे काम असतानासुद्धा आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी मात्र आपल्या केबिनमध्ये बसूनच तालुक्यातील रोजच्या रुग्ण संख्यांचा आढावा घेऊन, फक्त आणि फक्त आकडेवारी गोळा करण्यातच मशगुल असल्याकारणाने , आटपाडी तालुक्यातील कोरणा विषाणू संसर्ग रुग्णांची वाढ होण्यास आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी हे जास्तीत जास्त जबाबदार आहेत . त्यामुळे मा. सांगली जिल्हाधिकारी साहेब व महाराष्ट्र शासन यांच्याकडून अश्या कामचुकार व बेफिकीर अधिकाऱ्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आटपाडी तालुका अध्यक्ष मा. राजेंद्र खरात यांनी केली आहे.
आटपाडी व आटपाडी तालुक्या मध्ये दररोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. बेडच्या संख्या पुरेशा नाहीत. आणि उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसची देखील कमतरता आहे.
सध्या आटपाडी तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांना कसे थोपवायचे असा गंभीर प्रश्न प्रशासनापुढे असल्याने यावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तोडगा काढायला पाहिजे. परंतु, ते केवळ तालुक्यात दररोज किती रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. याचे आकडे गोळा करण्याशिवाय त्यांनी दुसरे कोणतेही काम केले नाही.
तालुका वैद्यकीय अधिकारी या नात्याने त्यांनी दररोज कोव्हीड सेंटर, लसीकरण या ठिकाणी भेट देवून त्याचा आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचारी यांना सूचना देवून रुग्ण कमी कसे होतील व त्यासाठी काय करावे लागेल याचा आढावा घेणे गरजेचे असताना ते ऑफिसमध्ये बसून आपले कामकाज चालवत आहेत.
हे वैद्यकीय अधिकारी मात्र आपली खुर्ची सोडून केबिनच्या बाहेर पडायला तयार होत नाहीत. त्यामुळे अशा वैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने यासंदर्भात मोठा उठाव केला जाईल असा इशारा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिला आहे.