• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

देश विकायला लागलेल्या मोदींची वटवट ??? विनोद दुआ

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 4, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
देश विकायला लागलेल्या मोदींची वटवट ??? विनोद दुआ

देश विकायला लागलेल्या पंतप्रधान मोदींची वटवट?? विनोद दुआ.
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ४ मार्च २०२१

देशात कोणत्याही प्रकारची विकास योजना आखली जाण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान मोदी गेली पाच वर्षे,सातत्यानं सभा -सेमीनार्स मधून,सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही असा बकवास करतात. या खंडप्राय देशाचा सतत अपमान करित आलेत…. मी मोदींची ती चूक सुधारत,मोदिंच्या वतीनं या देशाची माफी मागत, मोदींना काही गोष्टी विनोद दुआ सांगु इच्छितात…..मोदीजी,
तुम्ही जन्माला आलात १७ सप्टेबर १९५० रोजी, या दरम्यान देश स्वतंत्र होऊन या देशात एका सक्षम आणि अद्वितीय संविधानाची निर्मिती झाली होती आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे अद्वितीय संविधान या देशात रुजू झालं होतं, अर्थातच, तेव्हा जन्म ही झाला नव्हता..कदाचित तेव्हा पाळण्यात असणार बहुधा मोदीजी, कदाचित सहा महिन्यांचे असणार ,तेव्हा या देशांकडून, पहिल्या एशियन गेम्सचं अत्यंत देखणं आयोजन करुन झालं होतं…ते साल होतं १९५०
मोदी चार वर्षांचे… म्हणजे १९५४ ला, तर मोदीजी,या वर्षी या देशात भाभा अणुशक्ती केंद्र नावाचं एक सेंटर स्थापन होऊन ते कामाला सुद्धा लागलं होतं…
मोदी साहेब, ुम्ही ११ वर्षांचे झालात, पाचवीत वगैरे असाल तेव्हा,तर मोदीजी, तुम्ही अकराचे होता, त्यावेळी या देशात, डझनभर आय आय टी,आय आय एम,उघडली गेली होती,सेकडो विद्यापीठं उघडली गेली होती आणि याच संस्थांमधून जे टाॅप क्लास विद्यार्थी घडले , त्यातल्या काहींनी परदेशाचा रस्ता धरला, (आता तुम्ही परदेशी गेल्यावर तुम्हाला जो “मोदी मोदी” जल्लोष ऐकायला येतो ना ,तो याच नतदृष्टांचा….) तर मोदीजी, या देशात पहिली आय आय टी सुरू झाली खरगपूरला १९५० साली आणि पहिली आय आय एम सुरु झाली,१९६१साली कलकत्त्यात.. आय आय एम म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट…!
मोदीजी,याच वर्षी, १९६१ साली या देशानं, पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून,गोवा, या खंडप्राय देशात विलीन केला, तुम्ही तेव्हा केवळ अकरा वर्षांचे होता…मोदीजी, तुम्ही जेव्हा १३ वर्षांचे होता, तेव्हा या देशातलं , भाकरा नानगल नावाचं महाप्रचंड धरण बांधून झालं होतं…१९६२-६३

मोदीजी, तुम्ही चौदा वर्षांचे असताना, या देशात विमानांचं असेंबलिंग आणि हेलीकाॅप्टर्सची निर्मिती सुरू झाली..१९६४.
तुम्ही पंधरा वर्षांचे होतात, तेव्हा या देशाच्या फौजानी लाहोर पर्यंत धडक दिली होती… लाहोर पाकिस्तान नावाच्या देशात आहे आणि आपले उपोषण सम्राट अन्ना हजारे तेव्हा भारतीय सैन्यात ड्राइव्हवर होते….मोदीजी तुम्ही १९ वर्षांचे असाल तेव्हा…. तेव्हा या देशात १९६९ साली, तारापूर न्युक्लिअर पाॅवर प्लांट सुरू झाला होता, इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन याच वर्षी या देशात अस्तित्वात आलं होतं…मोदीजी, तुम्ही २१ चे झालात, या देशाचे कायदेशीर मतदार झालात, तेव्हा इंदिरा गांधी नावाच्या,या देशाच्या एका बुलंद पंतप्रधानानी, पाकिस्तान नावाच्या देशाचे दोन तुकडे करून,बांगला देश नावाचा एक नवा देश या भूतलावर जन्माला घातला… धर्माधिष्ठित संकल्पनेच्या आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान ,त्याचे दोन तुकडे होत असताना धर्म बिलकुल आडवा आला नाही बरं का..

मोदीजी,
तुम्ही २४ वर्षांचे झालात आणि या देशानं पहिलं परमाणू परिक्षण केलं बरं का…ते साल होतं १९७४.

मोदीजी, तुम्ही आता ३७ वर्षांचे झालात, म्हणजे साधारण १९८७ ला वगैरे..तर त्या दरम्यान,या देशात राजीव गांधी नावाच्या पंतप्रधानानी , सुपर कॉम्प्युटर आणि इनफाॅरमेशन टेक्नॉलॉजी नावाची नभूतो अशी क्रांती आणली आणि या देशानं प्रगतिच्या क्षितीजावर एक बुलंद भरारी घेतली……

राजीवजींचा खून झाला, नरसिंह राव नावाचे गंभीर आणि विद्वान गृहस्थ या देशाचे पंतप्रधान झाले, देश एका महाभयंकर आर्थिक संकटात सापडला होता,या देशाचं सोनं जागतिक बँकेकडे गहाण ठेवावं लागलं होतं पण तुम्हाला सांगतो मोदीजी, डॉ.मनमोहनसिंग नावाचे एक जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री , नरसिंह रावांच्या मंत्री मंडळात अर्थमंत्री होते, या अर्थमंत्र्यांनं आपल्या पंतप्रधानांच्या सहाय्यानं या देशात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करून देशाला त्या संकटातून अलगद बाहेर काढलं हो…..

हेच मनमोहनसिंग पुढे या देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते बरं का….

याच दरम्यान,मोदीजी,या देशात, चंद्रयान, मंगळयान, जीएसएलव्ही, मेट्रो, मोनोरेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, जहाजे,सबमरिन्स, पृथ्वी,अग्नी,पिनाक,नावाची मिसाईलस्, तेजस,चेतक, धनुष, नावाची हेलिकॉप्टर्स, सुखोई,मिग,नावाची फायटर विमानांची निर्मिती, अहो नुसती रेलचेल हो..काय आणि किती सांगू….

बरं असो मोदीजी आता पण शेवटचा एक प्रश्न विचारतो….

मोदीजी देशात झालेली ही अल्प,स्वल्पशी प्रगती खरच तुम्हाला ठाऊक नाही ?

आणि असेल ठाऊक तर मग तोंड उचकटून ,कशाला हो या देशाचा वारंवार अपमान करीत असता?
पुढे २०१४ च्या मध्यावर खुद्द नरेंद्र दामोदरदास मोदीच या देशाचे पंतप्रधान झाले आणि पुढचं तुम्हाला ठाऊक आहे,मी कशाला सांगू….७०वर्षात काय केले?

जे केले तेच विकून विकून सुध्दा देश चालवता येईना, स्वतःची थापांशिवाय कोणतीच बोंब पडली नाही.

Tags: BJPCmomaharashtraComoPm modi

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
पुणे बोर्ड चे अधिकारी मा.राजेश जावीर म्हणजे पे बॅक सोसायटी चे आदर्शवत उदाहरण..

पुणे बोर्ड चे अधिकारी मा.राजेश जावीर म्हणजे पे बॅक सोसायटी चे आदर्शवत उदाहरण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .