• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 20, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home शेतीविषयक

केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १० हजार ९०० कोटीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला (पीएलआय)

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 2, 2021
in शेतीविषयक, सामाजिक
0
केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १० हजार ९०० कोटीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला (पीएलआय)

नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (पीएलआय) सुमारे १० हजार ९०० कोटींचे अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.३१) घेतला. या दूरगामी निर्णयामुळे पीआयएल क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवरील “ब्रॅण्ड’ म्हणून सिद्ध होण्यास तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मोठी मदत होईल असे माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएलआय ला अनुदानाचा डोस देण्याबाबतचा एकच ठळक निर्णय करण्यात आला. जावडेकर व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाचा सातत्याने विस्तार होत असल्यामुळे यासाठी केंद्राने सबसिडी द्यावी अशी मागणी या मंत्रालयाच्या माजी मंत्री व अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही अनेकदा केली होती. गेली सहा वर्षे हे पद सांभाळणाऱ्या कौर यांनी कृषी कायद्यांना संसदेत मंजुरी मिळाल्याच्या निषेधार्थ नुकताच राजीनामा दिला. केंद्र सरकारने पीआयएल प्रोत्साहन योजनेअंतर्गत या क्षेत्रासाठी भरघोस सबसिडीची घोषणा केली. 

जावडेकर व गोयल यांनी सांगितले की पीआयएलबाबतच्या केंद्राच्या निर्णयामुळे आगामी काळात या क्षेत्रात किमान अडीच लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा निर्णय शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे कारण कृषी कायद्यांच्या पुढील पायरीवरील अन्नप्रक्रिया उद्योगाच्या सर्वंकष विस्तारासाठी तो पूरक आहे. जेव्हा भारतातील प्रक्रियाकृत अन्नपदार्थ जगभरात जास्तीत जास्त निर्यात होऊ लागतील तेव्हा स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. 

केंद्राने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात १२ ते १३ क्षेत्रांसाठी पीएलआय योजना आणण्याचा निर्णय घेतला होता. देशातील ६ क्षेत्रांसाठी याआधीच पीआयएल लागू करण्यात आली आहे. ताज्या निर्णयामुळे मूल्यवर्धित खाद्यान्न कृषी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, निर्यातीत वाढ होईल व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना उचित भाव मिळण्याबरोबरच मोठ्या संख्येने रोजगारही या क्षेत्रात निर्माण होतील असेही जावडेकर यांनी सांगितले. 
 
 

Tags: #pmoindia#prakshjavdekar#कृषी प्रक्रिया साठी अनुदान#केंद्रसरकर#शेतकरी योजना#शेतीविषयकअनुदान केंद्र सरकार

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
Next Post
धनगर समाजाचे शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना मा अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर भेट

धनगर समाजाचे शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना मा अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .